- Home
- Utility News
- International Plastic Bag Free Day Today : आता तरी नाही म्हणा, पर्यावरणाचा नाही तर किमान तुमचा स्वतःचा विचार करा!
International Plastic Bag Free Day Today : आता तरी नाही म्हणा, पर्यावरणाचा नाही तर किमान तुमचा स्वतःचा विचार करा!
मुंबई - ३ जुलै रोजी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. प्लास्टिक हे मानवी आयुष्यातील जहाल विष असून निसर्गावर त्याचा विपरित परिणाम होतो. आता तरी डोळे उघडे ठेवून प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा. आपला परिसर प्लास्टिकमुक्त करा…
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी
प्लास्टिकपासून मुक्ती मिळवा. प्लास्टिक कचरामुक्त भविष्य घडवण्यासाठी दरवर्षी ३ जुलै रोजी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्लास्टिकचा वापर मनापासून टाळू शकतो
हा दिवस प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतो. आपल्या वापरातील प्लास्टिक सहजपणे काढून टाकणे शक्य नाही. पण या दिवशी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि ज्यासाठी पर्यायी वस्तू उपलब्ध आहेत अशा प्लास्टिकचा वापर आपण मनापासून टाळू शकतो.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी
हे लक्षात घेऊन, केंद्र सरकारने १ जुलै २०२२ पासून प्लास्टिक स्ट्रॉसह एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातली आहे. कारण एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तू पृथ्वी आणि सागरी जीवांसाठी हानिकारक असतात हे आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केले आहे आणि त्यावर बंदी घातली आहे.
कागदी पिशव्या वापरू शकतो
फळे, भाज्या यांसाठी कापडी पिशव्या वापरू शकतो. बाहेर जाताना ९० च्या दशकातील पिवळ्या पिशव्या वापरण्याची गरज नाही, आता विविध डिझाईन्स आणि आधुनिक पिशव्या उपलब्ध आहेत. या हलक्या आणि टिकाऊ असतात. वायर बास्केट, कापडी पिशव्या थोड्या महाग असल्या तरी अनेक वेळा वापरता येतात. तसेच हलक्या वस्तूंसाठी, फॅन्सी स्टोअर, मेडिकलमधून खरेदी करताना कागदी पिशव्या वापरू शकतो.
कचऱ्याचे योग्य रीसायकलिंग आणि विल्हेवाट लावली पाहिजे
आपण प्लास्टिक कॅरीबॅग, पॅकिंग मटेरियल आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. संशोधकांनी प्लास्टिकचे पूर्णपणे विघटन करून, रीसायकल करून, पर्यावरणाला हानी न पोहोचवणारा पर्याय शोधला पाहिजे. सरकारने कचऱ्याचे योग्य रीसायकलिंग आणि विल्हेवाट लावली पाहिजे. यामुळे पर्यावरण सुधारेल.