पालकांनी १२ वीतील पाल्याची अशी घ्या तयारी करून, मिळतील डिस्टिंक्शन मार्क्स
बारावीच्या परीक्षेपूर्वीचा शेवटचा महिना गुण वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पालकांनी मुलांना अभ्यासाचे योग्य नियोजन, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि दररोजच्या उजळणीसाठी मदत करावी.

पालकांनी १२ वीतील पाल्याची अशी घ्या तयारी करून, मिळतील डिस्टिंक्शन मार्क्स
बारावीच्या परीक्षेआधीचा शेवटचा महिना हा गुण वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो. या काळात योग्य प्लॅनिंग आणि पालकांचा सपोर्ट विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शनपर्यंत पोहोचवू शकतो.
परीक्षेचा शेवटचा महिना अतिशय महत्वाचा
दररोजचे अभ्यासाचे टाइमटेबल बनवून द्या. कठीण विषयांसाठी जास्त वेळ आणि सोप्या विषयांसाठी रिव्हिजन स्लॉट ठेवा. टाइमटेबल भिंतीवर लावल्यास फॉलो करणे सोपे जाते.
मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्या
गेल्या 5–10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्या. त्यामुळे पेपर पॅटर्न, वेळेचे नियोजन आणि महत्त्वाचे टॉपिक स्पष्ट होतात. त्यामुळं आपण मुलांना वेळ लावून प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा.
दररोज अभ्यासाची रिव्हिजन करायला सुरुवात करा
दररोज अभ्यासाची रिव्हिजन करायला सुरुवात करा. नवीन अभ्यासापेक्षा या महिन्यात रिव्हिजनला प्राधान्य द्या. दररोज किमान 2 विषयांची उजळणी झाली पाहिजे याची पालकांनी खात्री करावी.
घरात शांत अभ्यासाचा वातावरण असुद्या
टीव्ही, मोठा आवाज, सतत पाहुणे यापासून दूर शांत वातावरण तयार करा. अभ्यासासाठी ठरलेली जागा आणि वेळ कायम ठेवा. त्यामुळं अभ्यास चांगला व्हायला मदत मिळते.
झोप आणि आहारावर लक्ष ठेवा
पुरेशी झोप (6–8 तास) आणि हलका, पौष्टिक आहार महत्वाचा आहे. जंक फूड कमी आणि पाणी जास्त यामुळे फोकस चांगला राहतो. आपण आपल्या फोकसवर जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवं.

