MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Ganesh Chaturthi 2025 : वाचा स्थापनेचा मुहूर्त, महत्त्व आणि महोत्सव का साजरा करतात

Ganesh Chaturthi 2025 : वाचा स्थापनेचा मुहूर्त, महत्त्व आणि महोत्सव का साजरा करतात

पुणे- गणरायाच्या आगमनाची वर्षभर आतुरता असते. हा सर्वांत लोकप्रिय आणि प्रिय हिंदू सणांपैकी एक आहे. याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. भगवान गणेश हे शिव-पार्वतींचे पुत्र असून, त्यांना विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धी आणि समृद्धीचे अधिपती मानले जाते.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Aug 25 2025, 11:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मुंबई, पुण्याच्या वेळा काय?
Image Credit : Instagram

मुंबई, पुण्याच्या वेळा काय?

हिंदू पंचांगानुसार २०२५ मध्ये गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट रोजी बुधवारी आहे. द्रिक पंचांगानुसार मध्यान्ह पूजेचा मुहूर्त सकाळी ११.०५ पासून दुपारी १.४० पर्यंत आहे. वेगवेगळ्या शहरांमध्येही वेळा ठरवलेल्या आहेत – जसे मुंबईत ११.२४ ते १.५५, पुण्यात ११.२१ ते १.५१, बंगळुरूत ११.०७ ते १.३६ इत्यादी. हा उत्सव दहा दिवस चालतो आणि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाने समारोप होतो.

26
नैवेद्यात २१ मोदक
Image Credit : Instagram

नैवेद्यात २१ मोदक

या दिवशी गणेशपूजेला खूप महत्त्व आहे. गणेशाची आराधना केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, असा विश्वास आहे. घराघरांत सजावट करून गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पूजा करण्याच्या १६ पद्धती आहेत. मूर्तीला लाल चंदन लावतात, जास्वंदाची फुले व दूर्वा अर्पण करतात. गणरायाला मोदक विशेष प्रिय आहेत, म्हणून नैवेद्यात २१ मोदक दाखवले जातात.

Related Articles

Related image1
Ganesh Chaturthi 2025: गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असावी?
Related image2
Ganesh Chaturthi 2025 : 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत मित्रपरिवाराला पाठवा खास मराठमोळे संदेश
36
गणराय परत कैलास पर्वतावर
Image Credit : Asianet News

गणराय परत कैलास पर्वतावर

उत्सवाच्या शेवटी ढोल-ताशांचा गजर, भजन-कीर्तन, नृत्य-गायन करत मूर्ती मिरवणुकीने नदी किंवा तलावाकडे नेली जाते आणि विसर्जन केले जाते. विसर्जनाचा अर्थ म्हणजे गणराय परत कैलास पर्वतावर, आपल्या आई-वडिलांकडे गेले, असे मानले जाते.

46
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले
Image Credit : Getty

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले

गणेशोत्सवाला धार्मिकासोबतच सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या काळात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असे. पुढे लोकमान्य टिळकांनी याला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यामागचा उद्देश समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणे आणि स्वातंत्र्यलढ्यात एकजूट निर्माण करणे हा होता.

56
मनोकामना पूर्ण होतात
Image Credit : Getty

मनोकामना पूर्ण होतात

आजही भारतासह परदेशातही गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. भक्त गणरायाकडे यश, बुद्धी, समृद्धी आणि अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात. असे मानले जाते की गणपतीची भक्ती मनापासून केली तर मनोकामना पूर्ण होतात आणि पापांचा नाश होतो. म्हणूनच गणेश चतुर्थी हा फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो.

66
पौराणिक कथा
Image Credit : Getty

पौराणिक कथा

गणेश चतुर्थी का साजरी केली जाते याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते. माता पार्वती स्नानाला जात असताना आपल्या अंगावरील उटण्याच्या मळापासून एका लहान मुलाची मूर्ती तयार करतात आणि त्यात प्राण फुंकतात. त्या मुलाला त्या खोलीबाहेर पहारा द्यायला सांगतात. त्याचवेळी भगवान शंकर तेथे येतात, पण मुलगा त्यांना आत जाऊ देत नाही. रागाच्या भरात शंकर त्याचे शिर छाटतात. पार्वती यामुळे दुःखी होतात. अखेरीस शंकर त्याला हत्तीचे शिर लावतात आणि तोच पुढे गणेश म्हणून ओळखला जातो. म्हणून या दिवशी गणेशाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो.

गणेशोत्सवाच्या विशेष बातम्यांच्या पेजला नक्की भेट द्या…येथे क्लिक करा..

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
गणेशोत्सव 2025

Recommended Stories
Recommended image1
मुंबई महापालिकेच्या ८०० कोटी निधी वाटपावरून वाद; विरोधकांचा भाजपवर दुजाभावाचा आरोप
Recommended image2
Mumbai Madgaon Special Train: कोकण अन् गोव्याला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-मडगाव दरम्यान धावणार 'स्पेशल' ट्रेन; सलग सुट्ट्यांचे टेन्शन मिटले
Recommended image3
Mumbai Local Journey Safe: महिलांनो, लोकलमध्ये संकट येताच फक्त एक मेसेज करा; मदतीला धावून येणार 'सखी'! जाणून घ्या नेमकं काय आहे हे नवीन फिचर
Recommended image4
ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य; मीरा-भयंदरमध्ये भाषिक चाचणीची कडक अंमलबजावणी
Recommended image5
भाईंदर स्थानकाचा थांबा चुकवला! विरार-चर्चगेट १५ डबा लोकल दोन किमी पुढे थांबली; संतप्त प्रवाशांनी एसी लोकल रोखली
Related Stories
Recommended image1
Ganesh Chaturthi 2025: गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असावी?
Recommended image2
Ganesh Chaturthi 2025 : 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत मित्रपरिवाराला पाठवा खास मराठमोळे संदेश
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved