जून महिना अर्धा संपला तरी महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला उशीर होत असला तरी, २५ जूननंतर पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

जून महिना सुरु होऊन १५ दिवस झाले तरी पाऊस अजूनही कोसळला नाही. शेतकरी पावसाच्या आशेने आभाळाकडे पाहत बसले आहेत. एल निनोचा प्रभाव असल्यामुळं पावसाळा सुरु होण्यास वेळ होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण आता पाऊस वेग धरणार असून लवकरच तो आपल्याकडं दाखल होईल असं सांगण्यात आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पेरणीयोग्य पाऊस झाला नाही 

अजूनही महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यात पाऊस कधी येणार आणि शेतकरी कधी पेरणी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पाऊस लांबणार नाही ना अशी भीती शेतकरी राजाला लागून राहिली आहे.

जुलै ते सप्टेंबर महिन्यात होणार कमी पाऊस 

जुलै ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. २५ जून रोजी ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं २५ जूननंतर पाऊस सक्रिय होईल असं सांगण्यात आलं आहे.

मध्य महाराष्ट्रात पाऊस कधी येणार 

मध्य महाराष्ट्रात पाऊस लवकरच दाखल होईल असं सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीला घाई करू नये. सरकारकडून पेरणी कधी करावी याबद्दलची सूचना देण्यात येईल. त्यानंतरच शेतात पेरणी करावी असं सांगण्यात आल आहे.