पुण्यातील भाजप शहराध्यक्षांच्या कार्यालयात वीजचोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणने छापा टाकून वीजजोड बायपास करून थेट विजेचा वापर सुरू असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे कंपनीचे ₹३८,००० चे नुकसान झाले आहे.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात ८१ नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करत संघटनात्मक बदल केले आहेत. यात शिरीष बोराळकर यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून, मुंबईत अॅड. आशिष शेलार यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
छगन भुजबळ यांनी १९९१ साली शिवसेना सोडण्यामागच्या खऱ्या कारणाचा खुलासा केला आहे. धर्माच्या नावाखालील राजकारण आणि अल्पसंख्याकांबाबतचा दृष्टिकोन यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला, असे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या वैधतेविरोधातील याचिकांवर सुनावणीसाठी तीन न्यायाधीशांचे विशेष खंडपीठ स्थापन केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत संविधान, लोकशाही आणि महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा झाली.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका युवकाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असून, पुढील चार आठवड्यांसाठी हवामान खात्याने इशारा दिला आहे. ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार यांच्या नावाने स्टॅण्डचे नामकरण करण्यात आले. मात्र, पवारांनी या सन्मानाबद्दल नम्रता व्यक्त करत, स्टेडियम उभारणीतील सर्वांचे योगदान अधोरेखित केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बीड जिल्ह्यातील केज शहरात भरधाव कंटेनरने 8-10 वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने कंटेनरला आग लावली.
नागपूर येथील महिला आणि तिची मुलगा लडाखला फिरायला गेले होते. या दरम्यान दोघे बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचा शोध घेण्यात येत आहे. गुप्तचर संस्थाही या कामी मदत करत आहेत.
Maharashtra