पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विषबाधेचा संशय आहे. शवविच्छेदन अहवालात विषारी घटकांचे संकेत आढळले असून, दिल्लीतील एम्समध्ये पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपासावर लक्ष केंद्रित आहे.
Monsoon 2025 : सध्या देशातील बहुतांश ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. यामुळे अनेकांच्या शेतीचे, घराचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशातच, यंदा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुरपरिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोविड-१९ रुग्णसंख्येत घट झाली असून नागपूरमध्ये कोणतेही सक्रिय रुग्ण नाहीत. तज्ज्ञांनी नागरिकांना घाबरू नका पण सतर्क राहा असा सल्ला दिला आहे. मास्कचा वापर, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात वाळू वाहतूक प्रकरणात १४ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी असून, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. राजाराम बंधाऱ्यावर नदीची पातळी ४२.२ फूट इतकी नोंदवण्यात आली असून, ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिच्या मोठ्या जाऊ मयुरी हगवणे हिच्या आईने, लता जगताप यांनी, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते.
भारतीय डाकसेवेने माथेरानसारख्या दुर्गम डोंगराळ भागात ड्रोनद्वारे पार्सल पोहोचवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामुळे पारंपरिक वाहतुकीच्या तुलनेत वेळेची मोठी बचत होणार आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या वडिलांनी पुणे बार असोसिएशनला पत्र लिहून आरोपी कुटुंबियांसाठी कोणताही वकील काम करू नये अशी विनंती केली आहे. पत्रात त्यांनी मुलीच्या मृत्यूनंतरच्या वेदना आणि हुंडाबळीविरोधातील भूमिका मांडली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भाजप महिला आघाडीने कोर्टाबाहेर निषेध व्यक्त केला असून आरोपींवर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्षांनीही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे.
Maharashtra