MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Indian Railways Shock: दिवाळीनंतर 76 ट्रेन फेऱ्या रद्द, प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन उध्वस्त!

Indian Railways Shock: दिवाळीनंतर 76 ट्रेन फेऱ्या रद्द, प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन उध्वस्त!

Indian Railways Shock: दिवाळीनंतर प्रवाशांची संख्या घटल्याने भारतीय रेल्वेने १५ नोव्हेंबरपासून ७६ रेल्वे फेऱ्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातील लातूर, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर विभागांवर झाला आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Nov 03 2025, 05:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
प्रवाशांना मोठा धक्का! रेल्वेकडून तब्बल 76 फेऱ्या रद्द
Image Credit : South Western Railways - SWR

प्रवाशांना मोठा धक्का! रेल्वेकडून तब्बल 76 फेऱ्या रद्द

Train Cancellation Update: दिवाळीचा उत्साह ओसरताच भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. सणानंतर प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्यामुळे १५ नोव्हेंबरपासून तब्बल ७६ रेल्वे फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

25
महाराष्ट्रातील अनेक विभागांवर परिणाम
Image Credit : social media

महाराष्ट्रातील अनेक विभागांवर परिणाम

या निर्णयाचा सर्वाधिक फटका लातूर, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर विभागांना बसला आहे. या मार्गांवरील अनेक गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
Alandi Yatra 2025: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! संजीवन समाधी सोहळ्यासाठी धावणार एसटीच्या जादा बसेस, जाणून घ्या
Related image2
Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! सिंधुदुर्ग आणि कणकवलीत थांबणार 8 एक्स्प्रेस गाड्या, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार थांबे!
35
दिवाळीनंतर प्रवाशांची संख्या घटली
Image Credit : iSTOCK

दिवाळीनंतर प्रवाशांची संख्या घटली

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी आणि छटपूजेच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक हजार अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या होत्या. त्या काळात प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. साडेचारशे अतिरिक्त फेऱ्यांमध्ये तब्बल सात लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र सण संपताच परिस्थिती पूर्णतः बदलली. अनेक गाड्या आता अर्ध्या रिकाम्या धावताना दिसत आहेत. काही फेऱ्यांमध्ये केवळ ६० ते ७० टक्केच प्रवासी असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. 

45
रद्द झालेल्या गाड्या
Image Credit : Social Media

रद्द झालेल्या गाड्या

रेल्वे प्रशासनाने पुणे आणि मुंबई विभागातील काही गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रमुख गाड्या पुढीलप्रमाणे आहेत.

हडपसर–लातूर

नागपूर–हडपसर

पुणे–अमरावती

कोल्हापूर–सीएसएमटी

कोल्हापूर–कलबुर्गी 

55
प्रवाशांसाठी सूचना
Image Credit : Social Media

प्रवाशांसाठी सूचना

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सल्ला दिला आहे की, तिकीट आरक्षण करण्यापूर्वी गाडीचे सध्याचे वेळापत्रक नक्की तपासावे. हा निर्णय फक्त तात्पुरता असून, प्रवाशांची मागणी पुन्हा वाढल्यास सर्व गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दिवाळीनंतर कमी झालेला प्रवासी प्रतिसाद हेच या निर्णयामागचे मुख्य कारण आहे. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून परिस्थितीनुसार लवचिक धोरण राबवले जाईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेच्या निकषांत होणार बदल? २०१९ नंतर जमीन घेणाऱ्यांनाही मिळणार लाभ? कृषीमंत्री दत्ता भरणे यांची मोठी घोषणा!
Recommended image2
नाशिक-अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गाचा मार्ग मोकळा! ३० गावांतील जमिनींच्या संपादनाला वेग; पाहा संपूर्ण यादी
Recommended image3
Konkan Railway: कोकणचा प्रवास होणार आणखी सुखकर! कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठा बदल; वेटिंग लिस्टचं टेन्शन मिटणार!
Recommended image4
पुणेकरांच्या घशाला उन्हाळ्यापूर्वीच कोरड! वानवडीत पाणी कपातीचा 'शॉक'; पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू
Recommended image5
सावधान! तुम्ही विकत घेतलेली फळं 'विष' तर नाहीत ना? मालाडमधील त्या फळविक्रेत्याचा संतापजनक प्रताप कॅमेऱ्यात कैद!
Related Stories
Recommended image1
Alandi Yatra 2025: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! संजीवन समाधी सोहळ्यासाठी धावणार एसटीच्या जादा बसेस, जाणून घ्या
Recommended image2
Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! सिंधुदुर्ग आणि कणकवलीत थांबणार 8 एक्स्प्रेस गाड्या, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार थांबे!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved