MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • मोठा बदल! केंद्र सरकार आणणार नवीन हवामानाधारित पीक विमा योजना, भरपाई मिळणार तात्काळ

मोठा बदल! केंद्र सरकार आणणार नवीन हवामानाधारित पीक विमा योजना, भरपाई मिळणार तात्काळ

Pik Vima Yojana: हवामान बदलामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार नवीन हवामानावर आधारित पीक विमा योजना आणत आहे. पॅरामेट्रिक विमा नावाच्या या योजनेत, हवामानाच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना थेट आणि तात्काळ नुकसान भरपाई मिळेल. 

2 Min read
Rameshwar Gavhane
Published : Oct 08 2025, 03:33 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
केंद्र सरकार आणणार हवामानावर आधारित नवीन पीक विमा योजना
Image Credit : Getty

केंद्र सरकार आणणार हवामानावर आधारित नवीन पीक विमा योजना

मुंबई: वाढत्या जागतिक तापमानामुळे हवामानामध्ये सतत अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हवामानावर आधारित नवीन पीक विमा योजना आणण्याचा विचार सुरू आहे.

या योजनेचा उद्देश म्हणजे अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, बेमोसमी पाऊस यांसारख्या घटनांमुळे होणारे शेतीचे नुकसान कमी करणे, तसेच शेतकऱ्यांना तात्काळ आणि पारदर्शक आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. 

27
ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढते हवामानाचे धोके
Image Credit : Asianet News

ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढते हवामानाचे धोके

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतात बेमोसमी हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरे दगावली, तर अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न बुडाले. तज्ज्ञांच्या मते, या सगळ्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे मुख्य कारण आहे.

आजकाल पावसाळ्यात दुष्काळ आणि उन्हाळ्यात अतिवृष्टीसारख्या घटना वारंवार घडत आहेत. या बदलत्या परिस्थितीचा विचार करून सरकारने हवामानाधारित विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Alert: पावसाचा प्रचंड कहर! पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, आपला जिल्हा आहे का यादीत?
Related image2
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांचा मोठा दिलासा, 31,628 कोटींचं मदत पॅकेज जाहीर; जाणून घ्या 10 मोठ्या घोषणा
37
सध्याची पीक विमा योजना आणि तिचे मर्यादित फायदे
Image Credit : Asianet News

सध्याची पीक विमा योजना आणि तिचे मर्यादित फायदे

सध्या ‘प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)’ अंतर्गत शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. मात्र, या योजनेत नुकसान भरपाईसाठी पंचनामा, अहवाल आणि वेळखाऊ पडताळणी प्रक्रिया आवश्यक असते. त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना भरपाई मिळायला उशीर होतो आणि आर्थिक अडचणी वाढतात. 

47
नवीन ‘पॅरामेट्रिक विमा योजना’ कशी असेल?
Image Credit : Asianet News

नवीन ‘पॅरामेट्रिक विमा योजना’ कशी असेल?

नव्या योजनेमध्ये पारंपरिक प्रक्रियेऐवजी ‘पॅरामेट्रिक विमा प्रणाली (Parametric Insurance)’ लागू केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डेटा-आधारित आणि स्वयंचलित असेल.

पावसाचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असेल,

तापमान ठराविक पातळीवर जाईल,

किंवा वाऱ्याचा वेग अधिक असेल…

…तर विमा कंपनी स्वयंचलितपणे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल.

यासाठी कोणताही अर्ज, कागदपत्रे किंवा तपासणीची गरज भासणार नाही हेच या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. 

57
फिजीचा यशस्वी अनुभव, भारतात आता अंमलबजावणीची तयारी
Image Credit : Gemini

फिजीचा यशस्वी अनुभव, भारतात आता अंमलबजावणीची तयारी

‘फिजी’ हा पॅरामेट्रिक विमा प्रणाली लागू करणारा पहिला देश आहे. तिथे चक्रीवादळ, पूर आणि दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना झपाट्याने आर्थिक मदत मिळाली. भारत आता फिजीच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून, देशातील हवामान आणि शेतीच्या गरजेनुसार सुधारित योजना लागू करणार आहे. 

67
भारतावर हवामान बदलाचा मोठा फटका
Image Credit : ChatGPT

भारतावर हवामान बदलाचा मोठा फटका

‘जर्मनवॉच ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025’ नुसार, भारत हा हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या देशांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. 1993 ते 2022 या कालावधीत देशात 400 हून अधिक नैसर्गिक आपत्ती घडल्या, ज्यात 80,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. याचा थेट फटका शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला आहे. 

77
नवीन विमा पद्धतीमुळे काय बदल होणार?
Image Credit : iSTOCK

नवीन विमा पद्धतीमुळे काय बदल होणार?

तात्काळ नुकसानभरपाई

पारदर्शक आणि डेटा-आधारित प्रक्रिया

कागदपत्रांची गरज नाही

हवामान बदलांवर वेगवान प्रतिसाद

शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्थैर्य वाढणार

केंद्र सरकारच्या या नव्या योजनेमुळे हवामान बदलामुळे सतत झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
Recommended image2
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट
Recommended image3
School Bandh : शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात राज्यातील शिक्षकांचा ‘बंद’; ८० हजारांहून अधिक शाळांवर परिणाम
Recommended image4
BMC Elections 2025 : महानगरपालिका निवडणुका लवकर? मतदारयाद्या 10 डिसेंबरला; आचारसंहिता 15 ते 20 तारखेदरम्यान लागू होण्याची शक्यता
Recommended image5
तुमचं रेल्वे स्टेशन 'वगळलं' गेलंय का? पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल... संगमनेरचा पत्ता कट, वाचा अहिल्यानगरचं भविष्य!
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert: पावसाचा प्रचंड कहर! पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, आपला जिल्हा आहे का यादीत?
Recommended image2
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांचा मोठा दिलासा, 31,628 कोटींचं मदत पॅकेज जाहीर; जाणून घ्या 10 मोठ्या घोषणा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved