महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने टपाली मतमोजणीमध्ये आघाडी घेतली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची टक्कर पाहायला मिळत आहे.

Maharashtra Elections 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील कल आता हाती येऊ लागला आहे, आणि या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात नवा वळण घेतला आहे. सध्या, भारतीय जनता पक्ष (भा.ज.पा.) सर्वात मोठा पक्ष ठरतोय, आणि त्यांनी टपाली मतमोजणीमध्ये आघाडी घेतली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष आता रंगत घेत आहे, आणि मतमोजणीच्या प्रारंभिक टप्प्यातच सर्वांनाच एक धक्कादायक चित्र पाहायला मिळालं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सकाळी ८.४५ पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, भाजपने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीतील शिवसेना २४ जागांवर आघाडीवर असून, राष्ट्रवादी काँग्रेसने १८ जागांवर सत्ता गाजवली आहे. महायुतीने २३३ जागांपैकी १२२ जागांवर आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. या आकड्यांनुसार, महायुतीसाठी एक सकारात्मक सुरुवात आहे, पण महाविकास आघाडीच्या जोरदार परतफेडीची शक्यता देखील नाकारता येत नाही.

महाविकास आघाडीच्या पिछाडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आता सर्वात मोठा पक्ष ठरत आहे, काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे, आणि ठाकरे गट २८ जागांवर आघाडी घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ३१ जागांवर आघाडी घेतली आहे. यामुळे, महाविकास आघाडीला राज्यभर सुस्पष्ट वळण मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

बारामतीत, पोस्‍टली मतांमध्ये अजित पवार सुरुवातीला पिछाडीवर होते, पण ताज्या आकडेवारीनुसार, त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे, बारामतीतील लढत अधिकच रंगत घेत आहे. त्याचवेळी, येवलामध्ये छगन भुजबळ आघाडीवर आहेत, ज्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला तगडी स्पर्धा मिळत आहे. नागपूरमध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतली आहे, आणि त्यांच्या विजयाच्या आशा जिवंत आहेत.

राज्यभरातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आणि मतदारांचा कौल यावर बरेच काही अवलंबून आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील कांटे की टक्कर उभा ठाकलेला असताना, महाराष्ट्राच्या भविष्यातील सत्ता संघर्ष नक्कीच चुरशीचा ठरेल.

.