बदलापूरच्या वालिवली गावाजवळ एका अनियंत्रित ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका महिलेचाही समावेश आहे. अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील वालिवली गावाच्या जवळ एक मोठा अपघात घडला. एका अनियंत्रित ट्रकने वाहनांना जोरात चिरडल्यामुळे एका महिलेसह तीन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. यावेळी सोशल मीडियावर फुटेज व्हायरल झालं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सीसीटीव्ही व्हिडीओ समोर 

अपघात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असून त्यात ट्रकने समोरून येणाऱ्या वाहनांना, दुचाकी व चारचाकींना जोरात धडक दिल्याचा धक्कादायक थरार दिसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होऊन नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

हृदय पिळवटून घटना 

अपघात इतका जबरदस्त होता की, अनेक वाहनांचे अवशेष लोकांच्या अंगावर उडाले आहेत. आसपासचे नागरिक आणि प्रवासी घटनास्थळी जमले आणि आपत्कालीन सेवा व पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देऊन रुग्णालयात दाखल केलं.

पोलिसांची कार्यवाही 

पोलीस आणि आपत्कालीन बचाव दल घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. संबंधित अधिकारी अद्याप ट्रक ड्रायव्हरचा शोध घेत आहेत. दुर्घटनेमागील कारणांचा तपास सुरू असून, तपशीलवार चौकशी केली जात आहे. या भीषण घडामोडीने बदलापूर परिसर हादरला असून, नागरिकांमध्ये संताप दाखवत प्रशासनाकडून तत्पर कारवाईची मागणी केली आहे.