गणेशोत्सवाला देशभरात 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. अशातच बाप्पाची सजावट करण्यासह त्याला फुलांनी सजवले जाते. तर काहीजण कापसाची वस्रमाळ तयार करुन बाप्पाला वाहतात. हीच वस्रमाळ कशी तयार करायची हे पाहू.
Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण मानला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचे आगमन होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने हा सण साजरा करण्याची परंपरा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात समाज एकत्र आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली.
गणेशोत्सवाच्या काळात वातावरण अत्यंत मंगलमय असते. सकाळ-संध्याकाळ आरत्या, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम यातून भक्ती आणि समाजसेवेचा संगम घडतो. गणेशाला मोदक हे अतिप्रिय नैवेद्य मानले जाते. त्यामुळे या दिवसांत घरोघरी उकडीचे मोदक, पुरणपोळी, लाडू यांसारखे पदार्थ बनवले जातात. गणपती बाप्पाला "विघ्नहर्ता" मानले जाते. भक्तांना संकटांपासून मुक्त करण्याची श्रद्धा असल्याने सर्वजण मोठ्या भक्तिभावाने बाप्पाचे पूजन करतात.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचेही प्रतीक आहे. अनेक मंडळे विविध सामाजिक संदेश देणाऱ्या सजावट आणि देखाव्यांची मांडणी करतात. रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन मोहिमा, प्लास्टिक मुक्ती अभियान यांसारखे उपक्रम या उत्सवात राबवले जातात. अलीकडच्या काळात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना जास्त प्राधान्य दिले जाते, जेणेकरून नदी-तलावांचे प्रदूषण टाळता येईल.
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात. ढोल-ताशांच्या गजरात, "गणपती बाप्पा मोरया, पुन्हा वर्षी लवकर या" या जयघोषात बाप्पांना निरोप दिला जातो. हा उत्सव भक्ती, एकता आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. गणेशोत्सवामुळे समाजात बंधुभाव वाढतो आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
VIDEO : पाहा कापसाची कंठी कशी तयार करायची याचा संपूर्ण व्हिडीओ शेवटपर्यंत…


