Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील आरोपी संथनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 32 वर्ष घालवले तुरुंगात

| Published : Feb 28 2024, 06:53 PM IST / Updated: Feb 28 2024, 06:58 PM IST

Santhan
Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील आरोपी संथनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 32 वर्ष घालवले तुरुंगात
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी संथनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांचा चेन्नईच्या राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 

Rajiv Gandhi : राजीव गांधी हत्येप्रकरणी सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील संथन नावाच्या एका दोषीचा बुधवारी (28 फेब्रुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चेन्नईच्या राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात आरोपीचा मृत्यू झाला. ते 55 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, यकृत निकामी झाल्याच्या तक्रारीनंतर संथनला जानेवारी महिन्यातच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना क्रिप्टोजेनिक सिरोसिस नावाच्या आजाराने त्रस्त असल्याचे आढळून आले. या आजाराबाबत डॉक्टरांनी सांगितले की, या आजारावर अचूक उपचार नाही.

चेन्नईच्या राजीव गांधी सरकारी सामान्य रुग्णालयाचे डॉ. ई. थेरनीराजन यांनी सांगितले की, दाखल करताना संथनची प्रकृती चिंताजनक होती. नुकताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सुरुवातीला शुद्ध आली असली तरी सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी संथनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, संथनची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. त्याने 32 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला, त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये त्याला इतर पाच दोषींसह सोडण्यात आले.

संथन हा श्रीलंकेचा रहिवासी - 
संथन व्यतिरिक्त इतर पाच जणांना सोडल्यानंतर त्रिची मध्यवर्ती कारागृहातील विशेष शिबिरात ठेवण्यात आले होते. याचे कारण हे सर्व श्रीलंकेचे नागरिक होते. मात्र, त्याच्याकडे पासपोर्ट किंवा प्रवासाची कागदपत्रे नव्हती. संथन उर्फ ​​टी सुतेंदिराजा यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या वृद्ध आईला भेटण्यासाठी श्रीलंकेला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. संथनच्या मृत्यूबद्दल रुग्णालयाच्या डीनने सांगितले की, त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जाईल. सध्या त्यांचे पार्थिव श्रीलंकेला पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
आणखी वाचा - 
PM Modi Tamil Nadu Visit : 'येथील मीडियाला प्रकल्पांबद्दल सांगायचंय, पण...' PM मोदींचा स्टॅलिन सरकारवर हल्लाबोल
हिमाचल प्रदेशातील बंडखोर आमदार पोहोचले हरियाणात, विधानसभेच्या अध्यक्षांनी जारी केली कारणे दाखवा नोटीस
CBI : बेकायदेशीर खाण प्रकरणी सीबीआयने अखिलेश यादव यांना बजावले समन्स, 29 फेब्रुवारीला उपस्थित होण्याचे दिले आदेश