Indian Railways: उगाच ट्रेनची चेन ओढल्याने रेल्वेला रोज बसतोय 1 कोटींचा फटका!
Indian Railways: आणीबाणीसाठी असणारी ‘अलार्म चेन’ रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे. प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे आणि वैयक्तिक कारणांसाठी चेन ओढल्याने रेल्वेला दररोज कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा कसा बोजा पडतो, ते पाहा

रेल्वेला दररोज सुमारे 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं नुकसान
देशभरात दररोज सरासरी 800 ते 1000 वेळा विनाकारण चेन ओढण्याच्या (ACP) घटना घडतात, असं रेल्वे सूत्रांनी सांगितलं. यामुळे रेल्वेला दररोज सुमारे 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं नुकसान होतं. वर्षाचा हिशोब केल्यास हे नुकसान शेकडो कोटींमध्ये जातं.

... 15 ते 25 हजार रुपये किमतीचं इंधन वाया
ताशी १०० किलोमीटर वेगाने धावणारी एक्सप्रेस ट्रेन थांबवून पुन्हा वेग पकडायला लावल्यास भरपूर वीज किंवा डिझेल जळतं. एकदा ट्रेन थांबून पुन्हा सुरू होण्यासाठी सुमारे 15 ते 25 हजार रुपये किमतीचं इंधन वाया जातं.
चेन ओढल्यामुळे ट्रेन धावते सरासरी 20 मिनिटं उशिरा
एका ट्रेनची चेन ओढल्यामुळे ती सरासरी 20 मिनिटं उशिरा धावते. याचा परिणाम तिच्यामागे येणाऱ्या 10 पेक्षा जास्त ट्रेनवर होतो. यामुळे हजारो प्रवाशांचा वेळ वाया जातो आणि रेल्वेचं वेळापत्रक कोलमडतं.
इमर्जन्सी ब्रेकमुळे चाकांची झीज
आरोपीने भरलेल्या दंडापेक्षा रेल्वेला होणारं नुकसान शंभर पटींनी जास्त
विनाकारण चेन ओढणं हा रेल्वे कायदा-1989 च्या कलम 141 नुसार गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी दोषी आढळल्यास एका वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1 हजार रुपये दंड आकारला जातो. पण, आरोपीने भरलेल्या दंडापेक्षा रेल्वेला होणारं नुकसान शंभर पटींनी जास्त असतं.

