Kitchen tips : भारतामध्ये भाताचे विविध प्रकार बनवले जातात. भात बनवण्याचीही एक पद्धत आहे. आजकाल अनेकजण तांदूळ धुतल्याबरोबर लगेच शिजवतात. पण तज्ज्ञांच्या मते ही योग्य पद्धत नाही. चला तर मग जाणून घेऊया भात शिजवण्यापूर्वी काय करायला हवं..

Kitchen tips : भारतात जसे सांस्कृतिक वैविध्य आहे, तसेच खाद्यपदार्थांचे वैविध्य आहे. त्यामुळे एकच पदार्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनविला जातो. नुसता भाताचाच प्रकार घेतला तर, वरण-भातापासून थेट नॉन-व्हेज बिर्याणीपर्यंत इतकी व्हरायटी पाहायला मिळते. त्यातही ठिकठिकाणचे मसाले त्याची लज्जत वाढवतच असते. तंदुरीचे कितीही प्रकार खाल्ले तरी अनेकजण जेवणाचा समारोप भातानेच करतात. ताक- भात किंवा साधं वरण आणि भात त्यांना हवाच असतो.

भारतात 'भात' हे बहुतेक सर्वांच्या घरातील मुख्य अन्न आहे. त्यामुळे काहीजण दिवसातून तीन वेळा भात खातात. तर काहीजण रोज भात खातात. कितीही भाकरी, इडली, डोसा, चपाती खाल्ली तरी भात खाल्ल्यावरच समाधान मिळतं, असं अनेकजण म्हणतात. पण आजकाल अनेकजण धावपळीच्या जीवनशैलीमुळे भात नीट न शिजवता खातात. त्यामुळे काही दुष्परिणाम होत आहेत. हे टाळण्यासाठी, भात शिजवण्यापूर्वी काही पद्धती फॉलो करायला हव्यात, त्याबद्दल येथे जाणून घेऊया.

आपल्या दिनक्रमात कधी ना कधी म्हणजे सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी... आपण भात नक्कीच खातो. पण भात खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते आणि वजन वाढते, असं आपण अनेकदा ऐकतो. विशेषतः दुपारी भात खाल्ल्यावर झोप येते. असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ही एक बाजू झाली, तर दुसरीकडे आजकाल अनेकजण तांदूळ धुतल्याबरोबर लगेच शिजवतात. पण तज्ज्ञांच्या मते ही योग्य पद्धत नाही. चला तर मग जाणून घेऊया भात शिजवण्यापूर्वी काय करायला हवं..

घरातील मोठी माणसं सांगतात की, भात शिजवण्यापूर्वी तांदूळ धुऊन काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत. आजही अनेकजण ही सवय पाळतात. पण काहीजण तांदूळ धुऊन लगेच शिजायला ठेवतात. पण तज्ज्ञांच्या मते ही योग्य पद्धत नाही. ते सांगतात की, तांदूळ धुतल्यानंतर किमान 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावेत. असे केल्याने अनेक फायदे होतात, असेही ते सांगतात.

काय फायदे आहेत?

भात शिजवण्यापूर्वी तांदूळ धुऊन भिजवल्याने त्यातील फायटिक ॲसिड निघून जाण्यास मदत होते. यामुळे पोषक तत्वांचे शोषण सुधारते. विशेषतः ज्यांना झिंक आणि लोहाची कमतरता आहे, त्यांनी भात शिजवण्यापूर्वी तांदूळ धुऊन भिजवणे चांगले आहे. तांदळात नैसर्गिकरित्या आर्सेनिक असू शकते. हा एक विषारी घटक आहे जो माती आणि पाण्यात आढळतो. कापणीच्या वेळी तो मुळांद्वारे शोषला जातो. तांदूळ इतर धान्यांपेक्षा जास्त आर्सेनिक शोषून घेतो. पण तांदूळ धुऊन भिजवल्याने आर्सेनिकचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे आरोग्याचे धोकेही कमी होतात.

गॅसची समस्याही टाळता येते!

तांदूळ धुूऊन भिजवल्याने एन्झाइमॅटिक ब्रेकडाउन होतो. यामुळे तांदळातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे साध्या साखरेत विघटन होते. यामुळे GI (ग्लायसेमिक इंडेक्स) देखील कमी होतो. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, तांदूळ भिजवण्यापूर्वी दोन ते तीन वेळा धुणे उत्तम. याशिवाय, तांदूळ धुवून भिजवल्याने भात लवकर शिजतो. तसेच तो पूर्णपणे शिजतो. पोटात चिकटपणा निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. यामुळे चव वाढते. तसेच तुम्हाला होणारी गॅसची समस्याही टाळता येते.

View post on Instagram