- Home
- Utility News
- Indian Union Budget History : केंद्रीय बजेटबद्दल 10 रंजक गोष्टी, ज्या 99% लोकांना माहीत नाहीत
Indian Union Budget History : केंद्रीय बजेटबद्दल 10 रंजक गोष्टी, ज्या 99% लोकांना माहीत नाहीत
Indian Union Budget History : ब्रिटिशांच्या काळात बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर केले जायचे. कारण भारतात संध्याकाळी 5 वाजले की लंडनमध्ये सकाळी 11.30 वाजलेले असत.

संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर व्हायचे
ब्रिटिशांच्या काळात बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर केले जायचे. कारण भारतात संध्याकाळी 5 वाजले की लंडनमध्ये सकाळी 11.30 वाजलेले असत. स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा 1999 पर्यंत सुरू होती. त्यानंतर 2001 मध्ये भाजप सरकारने यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात वेळ बदलून सकाळी 11 वाजता केली.
बजेट बंकरची परंपरा
1950 पूर्वी, बजेट राष्ट्रपती भवनात छापले जात होते. पण त्याच वर्षी बजेट लीक झाले. तेव्हापासून नॉर्थ ब्लॉकच्या तळघरातील एका गुप्त बंकरमध्ये बजेट छापले जाते. बजेट प्रक्रियेत सहभागी असलेले सुमारे 100 लोक 8 ते 10 दिवस आधी येथे बंदिस्त होतात. त्यांना मोबाईल, इंटरनेट किंवा इतर कोणताही बाह्य संपर्क नसतो. बजेट गोपनीय ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.
हलवा समारंभ
बजेटपूर्वी हलवा का बनवला जातो, याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड पदार्थाने करणे ही भारतीय परंपरा आहे. कोरोना काळातच या परंपरेत खंड पडला होता. बजेट छपाई सुरू होण्यापूर्वी, अर्थ मंत्रालय मोठ्या कढईत हलवा बनवते. अर्थमंत्री स्वतः तो वाढतात आणि संपूर्ण टीम तो खाते.
सर्वात लहान बजेट भाषण
आज बजेट 400-500 पानांचे असले तरी, एकेकाळी ते फक्त 800 शब्दांचे होते. 1977 मध्ये हिरूभाई पटेल यांनी सर्वात लहान, तर 2020 मध्ये निर्मला सीतारामन यांनी सर्वात मोठे (2 तास 42 मिनिटे) भाषण दिले.
अनोखे कर
स्वातंत्र्यानंतरही भारतीय नागरिकांवर 10 वर्षे विचित्र कर लावले गेले. जसे की, शब्दकोडी किंवा स्पर्धांमध्ये जिंकलेल्या बक्षिसांवर कर, भेटवस्तूंवर कर, खर्चावर कर. आता यात बरेच बदल झाले आहेत, पण आजही भेटवस्तू आणि मोठ्या खर्चांवर कर आकारला जातो.
2018 पर्यंत ब्रिटिश परंपरा होती
2018 पर्यंत, भारतीय बजेट काळ्या किंवा लाल ब्रीफकेसमध्ये सादर केले जात होते. ही ब्रिटिश ग्लॅडस्टोन बॉक्सची प्रतिकृती होती. 2019 मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही वसाहतवादी परंपरा सोडून पारंपरिक लाल रंगाच्या वही-खात्याचा वापर सुरू केला.
एका इंग्रज व्यक्तीने सादर केला होता पहिला बजेट
भारताचा पहिला बजेट 7 एप्रिल 1860 रोजी सादर झाला. तेव्हा ब्रिटिश राजवट होती. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश तिजोरी भरणे हा त्याचा उद्देश होता. त्यावेळी, ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने स्कॉटलंडचे नागरिक जेम्स विल्सन यांनी हे बजेट सादर केले होते. यात भारतीय नागरिकांवर कर लावण्यात आले होते.
भारताचा बजेट सादर करणारे मुस्लिम नेते
स्वातंत्र्यापूर्वी, लियाकत अली खान यांनी 'गरीब आदमी का बजेट' या नावाने भारताचे बजेट सादर केले होते. यात श्रीमंतांवर कर लावण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर फाळणी झाल्यावर लियाकत अली खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनले.
पंतप्रधानांनीही सादर केला आहे बजेट
भारताच्या इतिहासात तीन वेळा अर्थमंत्र्यांऐवजी पंतप्रधानांनी बजेट सादर केले आहे. प्रथम 1958 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, त्यानंतर 1970 मध्ये मोरारजी देसाईंच्या राजीनाम्यानंतर इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना बजेट सादर केले.
रेल्वे बजेटची परंपरा समाप्त
पूर्वी रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर केले जात होते. ही परंपरा 92 वर्षे चालली. याची सुरुवात 1924 मध्ये झाली होती. 2017 मध्ये ही परंपरा संपवून ते सामान्य बजेटमध्ये विलीन करण्यात आले. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेट सामान्य बजेटमध्ये विलीन केले.

