- Home
- Utility News
- Job News : अट फक्त 10वी पास.. परीक्षा, मुलाखतीशिवाय थेट केंद्र सरकारची नोकरी, आताच वाचा
Job News : अट फक्त 10वी पास.. परीक्षा, मुलाखतीशिवाय थेट केंद्र सरकारची नोकरी, आताच वाचा
Job News : लेखी परीक्षा नाही, मुलाखतीला जाण्याची गरज नाही... फक्त दहावीत चांगले गुण असतील तर थेट केंद्र सरकारची नोकरी मिळू शकते. त्यामुळे लगेच अर्ज करा.

परीक्षा आणि मुलाखतीशिवाय नोकरीची संधी
India Post Recruitment 2026: शिक्षणानंतर चांगल्या पगाराची स्थिर नोकरी मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण कठीण परीक्षांमुळे अनेकजण मागे राहतात. अशांसाठी केंद्र सरकारने एक उत्तम संधी दिली आहे. भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाही. निवड फक्त 10वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार होईल.
टपाल विभागात 25 हजारांहून अधिक नोकऱ्या
भारतीय टपाल विभाग देशभरात 25,000 हून अधिक ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांची भरती करत आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास उमेदवार किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. कमी शैक्षणिक पात्रतेसह सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. ही भरती देशभरात केली जात आहे.
अर्ज प्रक्रिया
इंडिया पोस्ट GDS भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 फेब्रुवारी 2026
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 5 फेब्रुवारी 2026 (रात्री 11 वाजेपर्यंत)
गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची अंदाजित तारीख: 20 फेब्रुवारी 2026
दहावीच्या गुणांवर आधारित नोकरी
उमेदवारांची निवड थेट दहावीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. 10वीच्या गुणांना प्राधान्य दिले जाईल. विशेषतः गणितातील गुणांना विशेष महत्त्व असेल. चांगले गुण असल्यास नोकरी तुमचीच समजा.
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार दरमहा 10,000 ते 29,480 रुपये पगार मिळेल. मुलाखतीशिवाय सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा.

