मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्यावर नेहमीच ताण असतो, ज्यामुळे पाणीपुरवठ्याची चिंता निर्माण होते. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईला पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमी झाली आहे.
मुंबई शहरात रोज हजारो लोक येत असतात. दिवसेंदिवस हे शहर वाढत चाललं आहे. या शहराची हि वाढती लोकसंख्येचा अंदाज घेऊन येथील पाण्यावर ताण येत आहे. त्यामुळं या सर्व लोकांना पाणी कस पुरवायचं हा प्रश्न सरकारला पडत असतो. मुंबईजवळची धरण भरली तरच येथील नागरिकांना पाणी टंचाईपासून सुटका मिळते.
कुठलं धरण भरलं?
मुंबईला पाणी पुरवठा करणारे धरण भरली आहेत. मागील २४ तासांमध्ये त्या धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळं जलसाठ्यात वाढ झाली. पावसाळा अजून संपलेला नसताना या परिसरातील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. मुंबईला आता पाणी टंचाई भासणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.
