ऑपरेशनल समस्यांमुळे विलंब झाल्यानंतर आणि क्रूचा ड्यूटी टाइम संपल्यानंतर सोमवारी मुंबई ते अहमदाबाद जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI2493 रद्द करण्यात आली.
मुंबई : ऑपरेशनल समस्यांमुळे विलंब झाल्यानंतर आणि क्रूचा ड्यूटी टाइम संपल्यानंतर सोमवारी मुंबई ते अहमदाबाद जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI2493 रद्द करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. एअरबस A321-211 विमान (VT-PPL) द्वारे नियोजित असलेली ही फ्लाइट या कारणामुळे कॅन्सल करण्यात आली आहे.
या विलंबादरम्यान, नियुक्त क्रू त्यांच्या फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन्स (FDTL) संपली होती, हा नियम सुरक्षेच्या कारणास्तव एअरलाइन क्रू मेंबर्सना काम करण्याच्या तासांवर बंधने घालणारा नियम आहे. दरम्यान, सोमवारी दिल्लीहून रांचीला जाणारी एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाइट तांत्रिक समस्येच्या कारणामुळं टेकऑफ झाल्यानंतर लगेचच राष्ट्रीय राजधानीकडे परत आणण्यात आली.
बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान सायंकाळी ६:२० वाजता रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर उतरणार होते. तपासणी आणि क्लिअरन्सनंतर, विमानात ऑपरेशन्स चेक करण्यात आले होते, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. "तांत्रिक समस्येच्या संशयामुळे आमची एक फ्लाइट टेकऑफनंतर दिल्लीला परतली. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो," असे एअर इंडिया एक्सप्रेसचे प्रवक्ते म्हणाले.
यापूर्वी, दिल्लीत उतरण्याची अपेक्षा असलेली एअर इंडियाची फ्लाइट, पायलटने मध्य-हवेत तांत्रिक समस्येचा संशय आल्यानंतर, हाँगकाँगला परतवण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. AI 315 फ्लाइट, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर, हाँगकाँगहून दिल्लीला निघाली होती. फ्लाइट ट्रॅकिंग साइट, फ्लाइट रडार २४ नुसार, एअर इंडियाची फ्लाइट दुपारी १२.२० वाजता दिल्लीत पोहोचणार होती. प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि विमानाची सुरक्षा तपासणी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले होते.
