- Home
- Maharashtra
- Shani Shingnapur : गावातील कोणत्याच घराला दारं नाही! ३०० वर्षांपासून कुलूप न लावण्यामागचं रहस्य काय?
Shani Shingnapur : गावातील कोणत्याच घराला दारं नाही! ३०० वर्षांपासून कुलूप न लावण्यामागचं रहस्य काय?
एखाद्या गावातल्या घरांना दरवाजेच नसतील, यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथे लोक आपल्या घरांना आणि मौल्यवान वस्तूंना सुरक्षित ठेवण्यासाठी कुलूप वापरत नाहीत.

दरवाजा नसलेलं गाव

पुरात वाहून आलेली काळी शिळा
या श्रद्धेमागे सुमारे ३०० वर्षं जुनी एक दंतकथा आहे. असं म्हणतात की, एकदा मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरात पानसनेळा नदीतून एक मोठी काळी शिळा गावात वाहून आली. गावकऱ्यांनी जेव्हा काठीने त्या शिळेला स्पर्श केला, तेव्हा त्यातून रक्तासारखा द्रव बाहेर येऊ लागला. त्यानंतर त्याच रात्री गावच्या प्रमुखाच्या स्वप्नात शनिदेव आले आणि ती शिळा म्हणजे माझंच स्वयंभू रूप आहे, असं त्यांनी सांगितलं, अशी आख्यायिका आहे.
उघड्यावर असलेले शनिदेव
खरंच कधी चोरी झाली नाही का?
बँक आणि पोलीस स्टेशनचं काय?
ही परंपरा फक्त घरांपुरती मर्यादित नाही. इथल्या बँक आणि पोलीस स्टेशनलाही दरवाजे नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. विशेषतः २०११ मध्ये UCO बँकेची एक शाखा 'कुलूप नसलेली बँक' म्हणून चर्चेत आली. पण याचा अर्थ तिथे सुरक्षा नव्हती, असं नाही. माहितीनुसार, या बँकेला काचेचा दरवाजा आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉकिंग सिस्टमसारखी सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे, शनि शिंगणापूरला फक्त 'दरवाजा नसलेलं गाव' म्हणून पाहण्याऐवजी, श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक सुरक्षा यांचा संगम असलेलं ठिकाण म्हणून समजून घेणं अधिक योग्य ठरेल.
