- Home
- Maharashtra
- Shetkari Karjmafi 2026: बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; खात्यात जमा होणार 'इतके' लाख, पाहा संपूर्ण अपडेट
Shetkari Karjmafi 2026: बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; खात्यात जमा होणार 'इतके' लाख, पाहा संपूर्ण अपडेट
Shetkari Karjmafi 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी' योजनेला वेग आला. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या २५ लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.

बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा
मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी’ योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीचा (SLBC) सविस्तर अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकरच राज्यातील सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील ओझं कमी होणार आहे.
२ लाखांपर्यंतची कर्जमाफी: कोणाला मिळणार लाभ?
राज्य सरकारने या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. सहकार विभागाने बँकांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, राज्यातील १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २४.७३ लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडे एकूण ३५,४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
'या' तारखेपर्यंतची थकबाकी होणार माफ
योजनेचे निकष अत्यंत स्पष्ट आहेत.
मुदत: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
कर्जाचा प्रकार: केवळ पीक कर्जच नव्हे, तर शेतीसाठी घेतलेली मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जेही या माफीच्या कक्षेत येणार आहेत.
थेट लाभ: पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.
या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा
बँकर्स समितीच्या अहवालानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थकबाकीदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगर यांसह एकूण १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा आधार मिळणार आहे.
प्रक्रिया कधी सुरू होणार?
पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत साधारणतः ३० जूनपर्यंत असते. त्यापूर्वीच कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे. सहकार विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांतच योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल.
"ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज नियमित आहे, पण इतर शेती कर्जे थकीत आहेत, अशांनाही या योजनेत सामावून घेतल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे."

