मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान लोकल ट्रेनमधून ८ प्रवासी अचानक रेल्वे ट्रॅकवर पडले, यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या निधीवाटपावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी निधी वळवल्याचा आरोप केला असला तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून सर्व खर्च नियमानुसारच झाल्याचे स्पष्ट केले आहे.
डॉक्टर डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यावर झालेली कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील बळीराम सावंत यांचे पैशाच्या वादातून अपहरण करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
हा दृश्य पाहून अनेकांनी तो चमत्कार मानला, झाडाला हार घातले, पूजाअर्चा सुरू केली, दर्शनासाठी गर्दी झाली. मात्र काही तासांतच या ‘चमत्काराचं’ सत्य समोर आलं आणि अंधश्रद्धेचा फुगा फुटला.
अजित पवार आणि मी अजूनही बहिण-भाऊ आहोत, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. पक्षाच्या आणि शरद पवारांच्या निर्णयालाच मान्यता देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शनिवारी रात्री नाशिकच्या पंचवटी परिसरात १०-१५ जणांच्या टोळक्याने घरांवर हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला पुन्हा एकदा या प्रतिष्ठेच्या संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, मराठी साहित्यप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बावंडी गावाजवळ शनिवारी सकाळी खासगी मिनी ट्रॅव्हल्स आणि सीएनजी टँकर यांच्यात भीषण अपघात झाला. ज्यात घरं, गुरांचा गोठा आणि वाहने जळून खाक झाली.
पुण्याजवळ खंडाळे गावात एका महिलेसह तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळले. प्रियकराने लग्नाच्या दबावातून तिघांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
Maharashtra