राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काही जिल्ह्यांत थैमान घातल्याचे दिसून आले होते. अशातच कोकणात सध्या पावसाचा सर ओसरला असून विदर्भात पावसाचा जोर वाढला गेला आहे. तर जाणून घेऊया हवामान खात्याचा आजचा अंदाच.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

भारतीय हवामान खात्याने (IMD) 31 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रासाठी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात मान्सूनचा शेवटचा टप्पा सुरू असतानाही काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामानात काही ठिकाणी बदलही दिसून येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्याच्या विविध भागांतील हवामान परिस्थितीचा आढावा घेऊया.

कोकणात मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता

कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे काही भागांत जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान खात्याने कोकणातील या भागांसाठी कोणताही अधिकृत अलर्ट अद्याप जारी केलेला नाही.

Scroll to load tweet…

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानाच्या बाबतीत, या भागांत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा आणि विदर्भात रिमझिम पावसाची शक्यता

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा किंवा रिमझिम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागात ढगाळ वातावरण राहू शकते. या भागांमध्ये कमाल तापमान 33-35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

विदर्भातील काही भागांमध्ये येलो अलर्ट

विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मान्सूनसंबंधी येलो अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ, या भागांमध्ये पुढील काही तासांत किंवा दिवसभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.