- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वादळ-पावसाची हजेरी! 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वादळ-पावसाची हजेरी! 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुढील २४ तासांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रात पुढील २४ तासांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता
मुंबई: महाराष्ट्रात पुढील २४ तासांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस आणि वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of North Konkan, North Madhya Maharashtra and Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 30, 2025
कोकण आणि मुंबई परिसर
पालघर आणि रायगड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, जिथे यलो अलर्ट जारी केला आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, याठिकाणी यलो अलर्ट जारी केला गेला आहे.
विदर्भ
अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्य आणि शेतीसाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

