- Home
- Maharashtra
- Dadar-Bhusawal Train Update: खान्देशवासीयांची चांदी! मुंबई-भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'; तिकीट दरातही मोठी कपात!
Dadar-Bhusawal Train Update: खान्देशवासीयांची चांदी! मुंबई-भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'; तिकीट दरातही मोठी कपात!
Dadar-Bhusawal Train Update: रेल्वे प्रशासनाने मुंबई (दादर) ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला नियमित दर्जा दिला, ज्यामुळे प्रवाशांच्या तिकीट दरात २०-२५ टक्क्यांची बचत होणारय. ही गाडी आता आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

खान्देशवासीयांची चांदी! मुंबई-भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'
Dadar-Bhusawal Train Update: खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक सुखद धक्का दिला आहे. मुंबई (दादर) ते भुसावळ दरम्यान धावणारी रेल्वे आता 'स्पेशल' राहिली नसून तिला नियमित गाडीचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा तर होणारच आहे, पण खिशाला पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे.
प्रवाशांची वर्षानुवर्षांची मागणी अखेर पूर्ण
आजवर दादर-भुसावळ ही गाडी केवळ 'विशेष गाडी' (Special Train) म्हणून चालवली जात होती. तिची मुदत ठराविक काळाने वाढवावी लागायची, ज्यामुळे प्रवाशांमध्ये कायम अनिश्चितता असायची. जळगाव, धुळे आणि नंदुरबार पट्ट्यातील प्रवाशांकडून या गाडीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, रेल्वेने ही गाडी कायमस्वरूपी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
तिकीट दरात २०-२५ टक्क्यांची बचत!
या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिकीट दरातील घट. विशेष गाड्यांचे भाडे नियमित गाड्यांच्या तुलनेत जास्त असते. आता ही गाडी नियमित झाल्यामुळे तिकीट दरात सुमारे २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आणि उपचारासाठी मुंबईला येणाऱ्या रुग्णांना होणार आहे.
गाडीचे सुधारित वेळापत्रक एका नजरेत
कधी धावणार: आठवड्यातून तीन दिवस (सोमवार, बुधवार आणि शनिवार).
मार्ग: दादर ते भुसावळ (आणि परतीचा प्रवास).
फायदा: कायमस्वरूपी दर्जा मिळाल्याने प्रवाशांना आता आगाऊ आरक्षणाची (Reservation) सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळेल.
महत्त्वाची टीप
प्रवाशांची गर्दी पाहता भविष्यात या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याबाबतही रेल्वे प्रशासन सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे आगामी काळात खान्देशसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

