Raksha Bandhan 2025 : यंदा रक्षाबंधन कधी? वाचा योग्य तारखेसह शुभ मुहूर्त
Raksha Bandhan 2025 : येत्या ९ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. खरंतर, रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्यात अतुट गोडवा निर्माण करणारा सण मानला जातो. जाणून घेऊया या सणाचा शुभ मुहूर्तासह अधिक माहिती सविस्तर….

रक्षाबंधन 2025
रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत भावनिक आणि पवित्र सण मानला जातो. बंधुत्वाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. २०२५ मध्ये रक्षाबंधन ९ ऑगस्ट, शनिवार या दिवशी येत आहे. हा दिवस केवळ एक धार्मिक परंपरा नसून, भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, विश्वास, नातेसंबंध आणि जबाबदारीचे प्रतीक आहे.
भावाबहिणीमधील अतुट नात्याचा सण
रक्षाबंधन दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या आयुष्याच्या सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भावाही तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला एखादी भेटवस्तू देतो. या छोट्याशा विधीमधून एक मोठा भावनिक आणि सामाजिक संदेश दिला जातो – की नात्यांची जपणूक ही जबाबदारीची आणि प्रेमाची गोष्ट असते. यामध्ये फक्त रक्ताचे नातेच नाही, तर मैत्री, जिव्हाळा आणि आत्मीयतेची भावना देखील असते.
शुभ मुहूर्त
यंदा रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त सकाळी १०:०० वाजल्यापासून सुरू होतो आणि राखी बांधण्याचा उत्तम कालावधी दुपारी १२:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत असण्याची शक्यता आहे. मात्र, पंचांग व स्थानिक वेळेनुसार थोडाफार फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या स्थानिक पंचांगानुसार वेळ तपासून घ्यावा.
रक्षाबंधनाचे महत्व
रक्षाबंधनाचे महत्त्व केवळ धार्मिक पातळीवरच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही खूप मोठे आहे. यामुळे बहीण-भावामधील नातं अधिक दृढ होतं आणि एकमेकांविषयी असलेली आपुलकी वाढते. काही ठिकाणी राखी फक्त भावाला नाही, तर सैनिक, डॉक्टर, गुरु, मित्र यांनाही बांधली जाते. म्हणजेच जो आपले रक्षण करतो, त्याला आदरपूर्वक राखी अर्पण केली जाते. ही परंपरा आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, हे शिकवते.
आधुनिक काळातील रक्षाबंधन
आजच्या आधुनिक काळातही रक्षाबंधनचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घराघरांमध्ये सणासाठी खास गोडधोड पदार्थ बनवले जातात, बहिणी भावाला राखी पाठवतात किंवा प्रत्यक्ष भेटतात, तर काहीजण ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारेही सण साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने नाती अधिक गहिरी होतात, आणि प्रेम, आदर, आणि जिव्हाळ्याने भरलेले असतात. म्हणूनच, रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून, तो भावनिक नात्यांची जपणूक करणारा एक सुंदर क्षण असतो.

