उन्हाळ्यात काही भाज्या शरीराचे तापमान वाढवून पित्त, अॅसिडिटी, त्वचेचे त्रास आणि डिहायड्रेशनसारखे त्रास उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, भेंडी, गवार, पालक, मेथी, मुळा, कांदा, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या उन्हाळ्यात टाळाव्यात. 

मुंबई | प्रतिनिधी सुपरफूड, हेल्दी डायेट आणि सेंद्रिय जीवनशैली यांचा बोलबाला असतानाही अनेक लोक अजूनही हवामानानुसार आहार बदलण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. उन्हाळ्यात काही भाज्या शरीराचं तापमान अधिक वाढवू शकतात, आणि त्यामुळे पित्त, अॅसिडिटी, त्वचेचे त्रास, आणि डिहायड्रेशनसारखे गंभीर त्रास उद्भवू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

या भाज्यांपासून उन्हाळ्यात सावध रहा 

  • भेंडी – पचायला जड असते आणि उष्णता वाढवते.
  • गवार – अधिक खाल्ल्यास गॅस आणि अपचन वाढू शकतं.
  • पालक आणि मेथी – पालेभाज्यांमध्ये उष्णतेची प्रवृत्ती अधिक असल्याने उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढू शकते.
  • मुळे आणि कांदा – उष्ण असले तरी काही लोकांना या भाज्यांमुळे अॅसिडिटी होऊ शकते.
  • कोबी आणि फ्लॉवर (फूलकोबी) – पचनसंस्थेला ताण देतात, गॅस आणि सूज वाढवू शकतात.

डॉक्टरांचं मत काय?

 हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, उन्हाळ्यात आहार हलका आणि थंड प्रवृत्तीचा असावा. शरीरात पाणी टिकून राहील असे घटक अधिक प्रमाणात घेतले पाहिजेत. जड, उष्ण आणि फॅटयुक्त भाज्या टाळल्या तर उष्माघात, त्वचारोग, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो.

काय खावं आणि काय टाळावं? आहारात सामाविष्ट कराव्यात:

  • दोडका, परवल, तुर, टोमॅटो
  • कोथिंबीर, दही, ताक, कारले, काकडी
  • फळांमध्ये कलिंगड, खरबूज, संत्री, डाळिंब

टाळाव्यात:

शेंगदाणा चटणी, गरम मसालेदार भाजी, वांगं, गवार, पालेभाज्या (अति प्रमाणात)