UPI Rules: UPI पेमेंटसाठी येतोय RBIचा 'गोल्डन अवर' नियम, काय आहे हे नवीन प्रकरण?
UPI Rules: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) UPI पेमेंटसाठी एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. काय आहे हा नियम आणि त्यामुळे फसवणूक खरंच थांबेल का? जाणून घेऊया.

UPI: आता फसवणुकीला बसणार चाप
काय आहे 'गोल्डन अवर' नियम?
एक तासाचा वेळ का गरजेचा?
सायबर चोरांचं मुख्य शस्त्र म्हणजे वेग. ते लोकांना फसवून पैसे मिळवतात आणि तुम्ही सावध होण्याआधीच ते पैसे दहा वेगवेगळ्या खात्यांमध्ये फिरवतात. हेच टाळण्यासाठी 'गोल्डन अवर' नियम आणला जात आहे. हा 60 मिनिटांचा वेळ तुम्हाला सावध होण्यासाठी आणि फसवणूक झाल्यास व्यवहार थांबवण्यासाठी संधी देईल. चुकीने पैसे पाठवले किंवा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास, त्या एका तासात व्यवहार थांबवता येईल.
कुणाला दिलासा, कुणाला त्रास?
सायबर गुन्हेगारीवर 'चेक मेट'
अनेकदा सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या लोकांना खात्यातून पैसे कापल्यानंतर 15-20 मिनिटांनी आपली फसवणूक झाल्याचे कळते. RBI ने प्रस्तावित केलेला हा 'गोल्डन अवर' नियम पोलीस आणि बँकांना गुन्हेगारांचे नेटवर्क तोडण्यासाठी एक शक्तिशाली शस्त्र ठरू शकतो. सध्या हा नियम प्रायोगिक टप्प्यात असून, 8 मे पर्यंत यावर लोकांकडून मतं मागवण्यात आली आहेत. हा नियम पूर्णपणे लागू झाल्यास, 'डिजिटल इंडिया'मध्ये 'निर्धास्त व्यवहारांचं' एक नवं पर्व सुरू होईल!

