एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुटुंब राजस्थानमधील नवीन एक्सप्रेसवेवर जेवण करताना दिसत आहे. त्यांनी चक्क रस्त्यालाच पिकनिक स्पॉट बनवलंय. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सुरक्षितता आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.
राजस्थानमधील एका नवीन राजस्थान एक्सप्रेसवेचा चक्क पिकनिक स्पॉट म्हणून वापर झाल्याचा एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक मोठं कुटुंब रस्त्यावर बसून जेवण करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे इंटरनेटवर नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि सुरक्षितता यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. @ThenNowForeve नावाच्या एका एक्स (X) युझरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात कुटुंबातील अनेक सदस्य ताटं घेऊन रस्त्यावर बसले आहेत आणि जेवणाचा आनंद घेत आहेत. तर काही जण त्यांना जेवण वाढत आहेत आणि आजूबाजूला फिरत आहेत.
या व्हिडिओवर मजेशीर अंदाजात एक ओळ लिहिलेली आहे, “हमारा घर इतना बडा है की एक साथ खाने बैठ जाये तो लगता है की भंडारा चल रहा है”, याचा ढोबळमानाने अर्थ होतो की, “आमचं घर इतकं मोठं आहे की सगळे एकत्र जेवायला बसलो की जणू काही भंडाराच सुरू आहे, असं वाटतं.”
मात्र, हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या युझरने या घटनेवर टीका केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचा वापर पिकनिक स्पॉट म्हणून केल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. या कुटुंबाने महामार्गावर जेवण करून सार्वजनिक मालमत्तेचा आणि नियमांचा अपमान केला आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहा
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी महामार्गावर गाडी थांबवून अशाप्रकारे जेवण करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने किती धोकादायक आहे, यावर बोट ठेवत कुटुंबावर टीका केली आहे.
एका युझरने लिहिलं, “हा तर मूर्खपणाचा कळस आहे. यांना अटक करून इतका दंड ठोठावला पाहिजे की आयुष्यात परत कधी महामार्गावर लघवीसाठी सुद्धा थांबायची हिंमत करणार नाहीत.”
तर दुसऱ्याने म्हटलं, “हा महामार्गाचा भाग नाहीये, पार्किंगची जागा रिकामी आहे, हवामान पण छान आहे. जर ते नंतर साफ करणार असतील तर काय हरकत आहे? अशा कुटुंबांमध्ये मजा तर येत असणार.”
तिसऱ्या एका युझरने सुरक्षेचा मुद्दा उचलत म्हटलं, “एक्सप्रेसवेवर थोडा वेळ आराम करण्यासाठी थांबलेल्या लोकांना ट्रकने चिरडल्याच्या घटना घडल्या आहेत... एक्सप्रेसवेवर 'थांबण्यास मनाई' असण्यामागे एक कारण आहे.”
एका युझरने लिहिलं, “कुणी विमानात नाश्ता करतं, कुणी ट्रेनमध्ये जेवतं, आता महामार्गाच्या कडेला. भारतीय लोक प्रत्येक पाश्चात्य 'कूल' गोष्टींची खिल्ली उडवत आहेत. माझी एकच इच्छा आहे: माझ्या प्रिय देशबांधवांनो, कृपया बेशिस्त वागू नका.”
