रक्षाबंधनानिमित्त लहान मुलींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली आणि त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनीही या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी MUDA जमीन घोटाळ्यात त्यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांनी दिलेल्या मंजुरीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये मृत आढळलेल्या महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, तिच्यावर अत्यंत क्रूरतेने हल्ला करण्यात आला होता आणि तिच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्या आहेत.
कोलकाता येथे महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टर संपावर गेले आहेत. पीडित कुटुंबाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या कारवाईवर असमाधानी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत नारायणगावात काळे झेंडे दाखवण्यात आले. तर, श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच, बेंगळुरूमध्ये एका तरुणीवर ऑटोचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली.
जम्मू-काश्मीरातील विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती न करता अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची रणनीती आखली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी काश्मीर खोऱ्यातील 8 ते 10 अपक्ष उमेदवारांसोबत निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
यूपीच्या बुलंदशहरमध्ये रविवारी एका भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. बस आणि मॅक्स पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून टीएमसी खासदार सुखेंदू शेखर रे यांना कोलकाता पोलिसांनी समन्स बजावले आहे. रे यांनी तपासावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका आईने आपल्या मुलाच्या जिद्दीपुढे हार मानून त्याला महागडा आयफोन घेऊन दिला आहे. व्यवसायाने फुले विकणाऱ्या महिलेचा मुलगा अनेक दिवसांपासून आयफोन खरेदी करण्याची मागणी करत होता.
गणेशोत्सवात डिजे आणि लेझर लाईटच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले आहेत. याचिकेत ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले होते.
India