Apollo Athenaa: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी डिफेन्स कॉलनीत आशियातील पहिल्या महिला-विशेष कर्करोग केंद्र 'अपोलो अथेना'चे उद्घाटन केले. हे केंद्र महिलांच्या कर्करोग उपचारांसाठी समर्पित आहे.
Dehradun Cloudburst : देहरादूनच्या सहस्रधारा भागात ढगफुटी झाल्याने 2-3 हॉटेल्स आणि अनेक दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. सुमारे 100 लोकांना गावकऱ्यांनी वाचवले, तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मसूरीत मलबा कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला.
Siddharth Shinde : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे वयाच्या 48 व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. ते गुंतागुंतीचे कायदे आणि निकाल साध्या भाषेत समजवून देण्यात पटाईत होते.
ITR Filing : आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरऐवजी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. ई-फायलिंग पोर्टलवरील प्रचंड ट्रॅफिक व तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला.
Indore Road Accident: इंदौरच्या एअरपोर्ट रोडवर एका भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ट्रकला आग लागली, जी अग्निशमन दलाच्या पथकाने विझवली.
Asia Cup 2025 : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ खेळत असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने तीव्र विरोध दर्शवला असून महाराष्ट्रभर निदर्शने केली जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये १८,५३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. तसेच, देशात पहिल्यांदाच सहा प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांना मोफत ऑनलाइन पूजा सुविधा मिळणार आहे.
Weather Alert : या वर्षाच्या उत्तरार्धात 'ला निना'ची स्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे जागतिक हवामान प्रणालीमध्ये बदल होऊन भारतात नेहमीपेक्षा जास्त थंडी जाणवू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Puneri Paltan जयपूरच्या एसएमएस इनडोअर स्टेडियममध्ये शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटनने तेलुगु टायटन्सवर ३९-३३ असा विजय मिळवून अव्वल स्थान गाठले. गौरव खत्री आणि विशाल भारद्वाज यांनी पुणेरी पलटनसाठी बचाव करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Love Story पालकांच्या विरोधाला न जुमानता रायचूरचे अमरेश नाईक आणि गदगच्या विजयलक्ष्मी राठोड यांनी धारवाडमध्ये लग्न केले आहे. दोसऱ्यांच्या प्रेमावर कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता. तरीही मित्रांच्या मदतीने त्यांनी संसार थाटला आहे.
India