लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 77.53 टक्के मतदानासह त्रिपुरा आघाडीवर होते तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी 52.74 टक्के मतदान झाले
- Home
- India
- Lok Sabha Election 2024 Second Phase Voting Updates : महाराष्ट्रात सर्वाधिक कमी 41 टक्के तर मणिपूर येथे सर्वाधिक 68.92 टक्के मतदान
Lok Sabha Election 2024 Second Phase Voting Updates : महाराष्ट्रात सर्वाधिक कमी 41 टक्के तर मणिपूर येथे सर्वाधिक 68.92 टक्के मतदान
;Resize=(380,220))
Secound Phase Voting : लोकसभा निवडणुकीसाठी आज (26 एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरातील 13 राज्यांसह 89 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, बिहार. छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, त्रिपुरासह मणिपुरमधील एक भाग मणिपुरच्या बाहेरील जागेचा समावेश आहे. दरम्यान, वर्ष 2019 मध्ये याच 88 जागांपैकी 52 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. याशिवाय काँग्रेसला 18 आणि शिवसेना व जेडीयूला चार-चार जागांवर विजय मिळवता आला होता. या व्यतिरिक्त 10 जागा अन्य खात्यात केल्या होत्या.
- FB
- TW
- Linkdin
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्रिपुरात 77.53 टक्के तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी 52.74 टक्के मतदान
बीजेडी नेते व्हीके पांडियन यांची निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडने केली कसून तपासणी
बीजेडी नेते व्हीके पांडियन नबरंगपूरमध्ये आले असता निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडने त्यांची कसून तपासणी केली.
त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.92 टक्के मतदान झाले असून महाराष्ट्रात सर्वात कमी 43.01 टक्के मतदान
त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.92 टक्के मतदान झाले असून महाराष्ट्रात सर्वात कमी 43.01 टक्के मतदान झाले.
आम्ही राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागा जिंकू, राजस्थानचे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केला विश्वास
आम्ही राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागा जिंकू असा विश्वास राजस्थानचे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यात काँग्रेसचे राज्य असताना त्यांनी लूट केल्याचा दावा केला आहे.
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुपारी 3 वाजेपर्यंतचे मतदान
- आसाम 60.32 टक्के
- बिहार 44.24 टक्के
- छत्तीसगढ 63.92 टक्के
- जम्मू-काश्मीर 57.76 टक्के
- कर्नाटक 50.93 टक्के
- मध्य प्रदेश 46.50 टक्के
- महाराष्ट्र 43.01 टक्के
- मणिपूर 68.48 टक्के
- राजस्थान 50.27 टक्के
- त्रिपुरा 68.92 टक्के
- उत्तर प्रदेश 44.13 टक्के
- पश्चिम बंगाल 60.60 टक्के
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी अरमोहा येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी अरमोहा येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.
मध्य प्रदेशात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान
मध्य प्रदेशात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान झाले आहे.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेमचंद बैरवा यांनी केले मतदान
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेमचंद बैरवा यांनी मतदान केले आहे.
दुसऱ्या टप्प्यात भाजपा-जेडीएस 14 जागांवर विजय मिळवेल- माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा
दुसऱ्या टप्प्यात भाजपा-जेडीएस 14 जागांवर विजय मिळवेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा यांनी व्यक्त केला आहे.
माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ यांनी केले मतदान
माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ यांनी मैसूर येथे मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर जवागल श्रीनाथ यांनी म्हटले की, “घराबाहेर पडून मतदान करणे आपला हक्क आहे. यामुळे नागरिकांनी मतदान करावे. आतापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. मतदान करणे फार महत्त्वाचे आहे.”
महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.77 टक्के मतदान
आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अशातच दुपारी 1 वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी किती मतदान झाले पाहा-
- आसाम 46.31 टक्के
- बिहार 33.80 टक्के
- छत्तीसगढ 53.09 टक्के
- जम्मू-काश्मीर 42.88 टक्के
- कर्नाटक 38.23 टक्के
- केरळ 39.26 टक्के
- मध्य प्रदेश 38.96 टक्के
- महाराष्ट्र 31.77 टक्के
- मणिपूर 54.26 टक्के
- राजस्थान 40.39 टक्के
- त्रिपुरा 54.47 टक्के
- उत्तर प्रदेश 35.73 टक्के
- पश्चिम बंगाल 47.29 टक्के
अभिनेता यश याने बंगळुरुत केले मतदान
अभिनेता यश याने बंगळुरुत मतदान केले आहे.
काँग्रेस नेते अनिल शास्री यांनी केले मतदान
माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्री यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते अनिल शास्री यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे.
इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम येथे केले मतदान
तिरुवनंतपुरम येथे इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी लोकसभेसाठी मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर सोमनाथ यांनी म्हटले की, “मतदान केल्याने आनंद होतोय. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. यामुळे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा.”
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात मतदारांनी मतदानासाठी फिरवली पाठ
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील शिरकापूर येथील पहासू ब्लॉकमधील अकरवास गावातील लोक मतदारांनी मतदानासाठी पाठ फिरवली आहे. एसडीएम शिकारपूर प्रियंका गोयल यांनी म्हटले की, एकही चांगला रस्ता तयार करण्यात आलेला नाही आणि तो पाण्याने भरला गेलाय. यामुळेच आम्ही मतदान करणार नाही. पण याआधी अशा प्रकारची तक्रार आली नसल्याचे प्रियंका गोयल यांनी म्हटले आहे.
माजी कर्नाटक मुख्यमंत्री आणि जेडीएस उमेदवार एचडी कुमारस्वामी यांनी केले मतदान
माजी कर्नाटक मुख्यमंत्री आणि जेडीएस उमेदवार एचडी कुमारस्वामी यांनी मतदान केले आहे.
अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांसह रवी राणांनी केले मतदान
अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांसह रवी राणांनी मतदान केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी गौतम बुद्ध नगर येथे केले मतदान
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे मतदान केले आहे.
भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केले मतदान
भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी म्हटले की, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी यावे. लोकशाहीच्या प्रक्रियेत योगदान द्या आणि मतदान करा. कारण मजबूत सरकार आणण्यासाठी तुमचे मत फार महत्त्वाचे आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले मतदान
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुंडी गावातील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.