भारतीय मनोरंजन विश्वात आपला ठसा उमठवणारे सुप्रसिद्ध निर्माता, वक्ते आणि गीतकार कुमार हे स्टुडिओ रिफ्युएल या उपक्रमाच्या माध्यमातून नवनवीन संगीतिक कार्यक्रम, प्रतिभावान कलाकारांना संधी, आणि दर्जेदार निर्मितीच्या वाटेवर यशस्वी वाटचाल करत आहेत.

भारतीय मनोरंजन विश्वात आपला ठसा उमठवणारे सुप्रसिद्ध निर्माता, वक्ते आणि गीतकार कुमार हे स्टुडिओ रिफ्युएल या उपक्रमाच्या माध्यमातून नवनवीन संगीतिक कार्यक्रम, प्रतिभावान कलाकारांना संधी, आणि दर्जेदार निर्मितीच्या वाटेवर यशस्वी वाटचाल करत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

‘अंताक्षरी’, ‘सुहाना सफर’ (डॉ. अन्नू कपूर यांच्यासह), ‘ए जिंदगी गले लगा ले’ (सुरेश वाडकर यांच्या सादरीकरणात) आणि अनूप जलोटा यांच्यासोबतचे भजन शो ही त्यांच्या यशस्वी संगीत शृंखलांची काही ठळक उदाहरणे आहेत. 'शर्तों लागू' आणि 'विक्कीडा नो वरघोडो' या चित्रपटांचे निर्मातेही कुमार आहेत, आणि आता ते आगामी सिनेमे सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

भोपाळ आणि उज्जैन येथे त्यांनी यशस्वी संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले. नुकत्याच त्यांच्या डॉ. अन्नू कपूर यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी झालेल्या भेटीमुळे त्यांचे सांस्कृतिक नेतृत्वाशी संबंध अधिक दृढ झाले आहेत.

ITSF पुरस्कारांमध्ये कुमार यांना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार समाजसेवक दत्तात्रय माने यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात आले होते, ज्यात विविध क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तींना गौरवण्यात आले. या समारंभात कुमार यांनी सुदेश भोसले, रुहान कपूर, सिद्धांत कपूर यांसारख्या नामांकित व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण शेअर केले.

‘लाईफ अनपॅक्ड’ नावाच्या त्यांच्या नव्या पॉडकास्ट मालिकेत कुमार नामवंत व्यक्तींच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकतात. आतापर्यंत झहरा खान, तनिष्क बागची, मोहन बग्गड यांच्यासारख्या कलाकारांनी सहभाग घेतला असून, आगामी भागांमध्ये अभिनेता रणजीत, संग्राम सिंह, अनूप जलोटा, सुरेश वाडकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

स्टुडिओ रिफ्युएलच्या माध्यमातून कुमार नवोदित कलाकारांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या म्युझिक लेबलअंतर्गत लवकरच नवीन गाणी व म्युझिक व्हिडिओ प्रसिद्ध होणार असून, यात नव्या आवाजांनाही महत्त्व दिले जाईल.

ITSF पुरस्कारविषयी बोलताना कुमार म्हणाले, “विविध क्षेत्रांतील लोकांचा गौरव होताना पाहून खूप समाधान वाटले. अशा कार्यक्रमांमधून आम्हा सर्वांना प्रेरणा मिळते.”

आपल्या प्रतिभा, संकल्पशक्ती आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाच्या जोरावर कुमार आज भारतीय मनोरंजन सृष्टीत एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.