- Home
- Entertainment
- अभिनेत्री जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापली नस, दोघांचं लग्न झाल्याचा केला दावा
अभिनेत्री जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापली नस, दोघांचं लग्न झाल्याचा केला दावा
२००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाच्या दिवशी मॉडेल जान्हवी कपूरने मोठा गोंधळ घातला होता. अभिषेक आपला पती असल्याचा दावा करत, ऐश्वर्याने आपला पती चोरल्याचा आरोप करत जान्हवीने विवाहस्थळी आपल्या हाताची नस कापली होती.

अभिनेत्री जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापली नस, दोघांच लग्न झाल्याचा केला दावा
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून चर्चेत येत आहेत. दोघांच्या घटस्फोटाबाबत अनेक चर्चा सुरु असल्याचं दिसून आलं आहे.
दोघांच्या लग्नात आली होती सतरा विघ्न
ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न २००७ मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नात विघ्न आल्यानंतर दोघांनी सात जन्माच्या शपथी घेतल्या होत्या. अभिषेकच्या लग्नाच्या दिवशी जान्हवी कपूरने धिंगाणा घातला होता.
जान्हवी कपूरने काय आरोप केला?
जान्हवी कपूरने आरोप केला आहे की, ऐश्वर्या रायने माझा पती चोरला आहे. यादरम्यान जान्हवी कपूरने आपल्या हाताची नस देखील कापली. अभिषेक बच्चनसोबत माझे लग्न झाल्याची ती परत परत सांगताना दिसली.
जान्हवी विवाहस्थळी पोहचली
जान्हवी ही ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या लग्नात जान्हवी विवाहस्थळी पोहचली होती. जान्हवी कपूर एक मॉडेल असून तिने अभिषेकसोबत दस चित्रपटात काम केलं होतं. या मॉडेल जान्हवी कपूर हिने ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नामध्ये मोठा धिंगाना घातला होता. ज्याची तूफान चर्चा रंगताना दिसली.
अभिषेक सोबत लग्न झाल्याचा केला होता दावा
अभिषेक बच्चन आणि जान्हवी कपूर या दोघांच लग्न झाल्याचा दावा जान्हवीने केला होता. तिच्याकडे काहीच पुरावे अभिषेक आणि तिच्या लग्नाचे नव्हते. यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तक्रार देखील घेतली नव्हती.
जान्हवीने कापली होती हाताची नस
जान्हवी कपूरने हाताची नस कापल्याचा किस्सा घडला होता. अभिषेक माझा पती आहे… आमच्या दोघांचे लग्न अगोदरच झाले आहे.. ऐश्वर्या राय हिने माझा पती चोरला आहे… असं म्हणत तिने हातावर वार केले होते.

