Iran Missile Hits Jerusalem on Eid Near Al Aqsa Mosque : ईद-उल-फितरच्या दिवशीच जेरुसलेममध्ये मोठी खळबळ उडाली. इराणने डागलेलं एक मिसाइल थेट पवित्र अल-अक्सा मशिदीपासून काही मीटर अंतरावर कोसळलं. 

Iran Missile Hits Jerusalem on Eid Near Al Aqsa Mosque : शनिवारी जगभरात ईदचा सण साजरा होत असताना, इराणने इस्रायलच्या पवित्र शहर जेरुसलेमवर (Jerusalem) मिसाइल हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की एक मिसाइल थेट अल-अक्सा मशिदीपासून (Al-Aqsa Mosque) काही मीटर अंतरावरच कोसळलं. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराने (IDF) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात इराणच्या बॅलिस्टिक मिसाइलचे अवशेष आणि तुकडे (shrapnel) पवित्र ओल्ड सिटीवर पडताना स्पष्ट दिसत आहेत. हे मिसाइल अल-अक्सा कंपाऊंडच्या इतक्या जवळ पडलं की तिथे एक मोठा खड्डा (Crater) तयार झाला आहे. सुदैवाने, डोम ऑफ द रॉक (Dome of the Rock) किंवा मशिदीच्या मुख्य भागाचं मोठं नुकसान झालं नाही. पण आजूबाजूच्या रस्त्यांवर ढिगभर अवशेष पसरले आहेत.

Scroll to load tweet…

६० वर्षांत पहिल्यांदाच मशिदीला कुलूप

जेरुसलेमच्या इतिहासात १९६७ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा रमजानच्या शेवटच्या १० दिवसांत आणि ईदच्या दिवशी अल-अक्सा मशिदीचे दरवाजे नमाजींसाठी बंद करण्यात आले. इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव अल-अक्सा, होली सेपल्चर चर्च आणि वेस्टर्न वॉल, ही तिन्ही पवित्र स्थळं बंद करण्यात आली आहेत.

रस्त्यावर नमाज आणि वेदनादायी चित्र

मशीद बंद असल्यामुळे हजारो नमाजी ओल्ड सिटीच्या बंद दरवाजांबाहेर जमले. त्यांना नाईलाजाने रस्त्यावर आणि गेटबाहेरच ईदची नमाज अदा करावी लागली. वजदी मोहम्मद श्विकी नावाच्या एका वृद्ध पॅलेस्टिनी नमाजीने भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 'आज आमच्याकडून अल-अक्सा हिसकावून घेण्यात आली. हा एक दुःखद आणि वेदनादायी रमजान आहे. जेरुसलेमचे रहिवासी आणि जगभरातील मुस्लिमांसाठी ही परिस्थिती एखाद्या आपत्तीपेक्षा कमी नाही.'

फक्त मशीदच नाही, चर्चवरही मिसाइल हल्ला

इस्रायली पोलिसांनी काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यात दिसतंय की मिसाइलचा एक मोठा तुकडा 'चर्च ऑफ द होली सेपल्चर'च्या छतावरही पडला आहे. ख्रिश्चन धर्मानुसार, हे तेच पवित्र ठिकाण आहे जिथे येशू ख्रिस्तांना दफन करण्यात आलं होतं. इस्रायलचं म्हणणं आहे की, इराणने हा हल्ला कोणताही विचार न करता केला होता. त्यांचा उद्देश फक्त विनाश घडवणं होता, मग ते नागरी वस्ती असो किंवा जगातील सर्वात पवित्र स्थळं.