Sugar Price : सणासुदीच्या तोंडावर साखर महागली, पण खरं कारण काय? सरकार म्हणतं...
सणासुदीच्या तोंडावर भारतात साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. पण इथेनॉल उत्पादनामुळे हे घडत नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. मग तुमचा चहा महाग का होतोय? जाणून घ्या सरकारचं स्पष्टीकरण.

साखरेच्या दरात वाढ

साखरेच्या वाढत्या किमतीमागील कारणं...
सरकारकडून काय पावलं उचलली गेली
एका महिन्यात ८ रुपयांहून अधिक वाढ
भाववाढीसाठी इथेनॉल उत्पादनाला दोष देणं चुकीचं
मंत्रालयाने स्पष्ट केलं की, 'भाववाढीसाठी इथेनॉल उत्पादनाला दोष देणं चुकीचं आहे.' इथेनॉल उत्पादनाचा साखरेच्या दरावर परिणाम होत नाही, हे दाखवण्यासाठी आकडेवारीही दिली. 2022-23 मध्ये सुमारे 12 टक्के साखर इथेनॉलसाठी वापरली गेली, तर 2025-26 पर्यंत हे प्रमाण 9 टक्क्यापर्यंत खाली येईल. सध्या देशातील जवळपास तीन चतुर्थांश इथेनॉल मका आणि इतर धान्यांपासून बनवलं जातं.
किमती वाढण्यामागील कारण
साखरेचं उत्पादन कमी का?
आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेची कमतरता
आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेची टंचाई आहे. खराब हवामानामुळे 2026-27 साठी जागतिक साखरेची तूट 33 लाख मेट्रिक टन असू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे, 30 जून रोजी 474 डॉलर प्रति टन असलेला आंतरराष्ट्रीय भाव 20 ऑगस्टपर्यंत 552 डॉलरवर पोहोचला. म्हणजे दोन महिन्यांपेक्षा कमी काळात 16 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली.
15 दिवसांपेक्षा जास्त साखर साठवण्यास बंदी
खबरदारीचा उपाय
ग्राहक आणि ऊस उत्पादक शेतकरी दोघांच्याही हिताचं रक्षण करण्यास कटिबद्ध
मंत्रालयाने नमूद केले की, इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळवण्यासारख्या सुधारणांमुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. यामुळे कारखान्यांना 20 ऑगस्टपर्यंत 2025-26 हंगामासाठी शेतकऱ्यांची 97 टक्के देणी चुकवता आली. ऑगस्ट 2024 ते जुलै 2026 दरम्यान, साखरेच्या किरकोळ दरात वार्षिक फक्त 3 टक्के वाढ झाली आहे. 'सरकार ग्राहक आणि ऊस उत्पादक शेतकरी या दोघांच्याही हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे,' असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.

