- Home
- Utility News
- तुम्ही महिनाभर साखर सोडली तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या उपयुक्त माहिती
तुम्ही महिनाभर साखर सोडली तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या उपयुक्त माहिती
What Happens When You Stop Eating Sugar : साखर पूर्णपणे सोडल्याने अनेक चांगले परिणाम दिसून येतात. चहा, कॉफीमध्येही साखर न घालता पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. फक्त 30 दिवस साखर सोडून बघा.

फक्त 30 दिवस साखर सोडून बघा
आपल्या रोजच्या आहारात साखर एक अविभाज्य भाग बनली आहे. सकाळी उठल्याबरोबर चहा, कॉफीमध्ये साखर घालून दिवसाची सुरुवात होते. तसेच स्वीट्स, केक, ज्यूस, ब्रेड अशा अनेक पदार्थांमध्ये साखर असते. अनेक पदार्थांमध्ये साखर असते, जी नकळतपणे आपल्या शरीरात जाते. पण 30 दिवस साखर खाल्ली नाही, तर शरीरात अनेक चांगले बदल होतात, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. शुगर फ्री चॅलेंज घेऊन बघा. एक महिना रिफाइंड शुगर पूर्णपणे सोडा. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतील.
वजन कमी होते
साखरेमध्ये कॅलरीज जास्त असतात, पण पौष्टिक मूल्ये खूप कमी असतात. रोजच्या चहा, कॉफी, ज्यूसमध्ये साखर घालणे बंद केल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होतात. त्यामुळे शरीरात साठलेली चरबी वितळून वजन कमी होऊ लागते. विशेषतः पोटावरची चरबी (बेली फॅट) कमी करण्यासाठी हे खूप मदत करते, असे तज्ज्ञ सांगतात.
त्वचेला चमक येते
साखर खाल्ल्यावर तात्पुरती ऊर्जा येते, पण नंतर थकवा जाणवतो. साखर सोडल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते. साखरेमुळे त्वचेवर मुरुमे, तेलकटपणा येतो. महिनाभर साखर सोडल्यास त्वचा नैसर्गिकरित्या चमकते आणि मुरुमे कमी होतात. चेहऱ्यावरील लहान पुरळही कमी होतात.
मेंदूसाठी चांगले
साखरेचा मेंदूच्या कार्यावरही वाईट परिणाम होतो. साखर कमी केल्याने चांगला परिणाम होतो. जास्त साखरेमुळे 'ब्रेन फॉग'ची समस्या येते, म्हणजे मन स्पष्ट काम करत नाही आणि एकाग्रता कमी होते. साखर सोडल्यास मेंदू सक्रिय होतो आणि कामावर लक्ष केंद्रित होते. अनावश्यक चिंता आणि अस्वस्थ भावनाही कमी होतात. जास्त साखरेमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे झोपेच्या समस्या येतात. साखर न घेतल्यास रात्रीची झोप सुधारते.
मधुमेह होत नाही
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर सोडावी. साखर सोडल्याने इन्सुलिनची पातळी स्थिर होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. मधुमेहींसाठीही हे खूप उपयुक्त आहे. हे हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. जास्त साखरेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. साखर सोडल्याने मन शांत राहते. महिनाभर साखर सोडल्यास शरीर आणि मनात आश्चर्यकारक बदल होतात, असे तज्ज्ञ सांगतात.

