- Home
- Utility News
- PM किसान योजनेपेक्षा मोठा खजिना! या 5 सरकारी योजना बदलू शकतात शेतकऱ्यांचं नशिब, पण 90% शेतकऱ्यांना अजूनही माहितीच नाहीत!
PM किसान योजनेपेक्षा मोठा खजिना! या 5 सरकारी योजना बदलू शकतात शेतकऱ्यांचं नशिब, पण 90% शेतकऱ्यांना अजूनही माहितीच नाहीत!
Top 5 Farmer Schemes : भारतातील शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना आहेत ज्या त्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकतात आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. या 5 अशा योजनांची माहिती दिली ज्यात पेन्शन, पीक विमा, आधुनिक प्रशिक्षण, आणि सिंचनासाठी मदत करतात.

Top 5 Farmer Schemes : भारतात लाखो शेतकरी अजूनही अशा अनेक महत्वाच्या सरकारी योजनांपासून दूर आहेत, ज्या त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ करू शकतात, आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडू शकतात आणि त्यांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतात. जरी PM किसान योजना दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करत असली, तरी पुढील 5 योजना शेतकऱ्यांसाठी लाखोंचा लाभ, आजीवन पेन्शन, आणि आपत्तीमध्ये संरक्षण यासारखे अनेक फायदे घेऊन आल्या आहेत. चला जाणून घेऊया त्या योजनांबद्दल, ज्या अजूनही बहुतांश शेतकऱ्यांसाठी अपरिचित आहेत.
१. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY)
ही योजना 18 ते 40 वयोगटातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दरमहा केवळ ₹55 ते ₹200 भरावे लागतात आणि सरकारदेखील त्याच इतकी रक्कम जमा करते. 60 वर्षांनंतर शेतकऱ्याला दरमहा ₹3,000 पेन्शन मिळते. ही योजना वृद्धापकाळात आर्थिक आधार बनते, विशेषतः अशा शेतकऱ्यांसाठी जे कमाईच्या इतर कोणत्याही स्त्रोतावर अवलंबून नाहीत.
२. प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना (PM Dhan Dhanya Krishi Yojana)
ही नव्याने सुरू झालेली योजना (16 जुलै 2025) देशातील 100 मागास कृषी जिल्ह्यांमध्ये अमलात आणली जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण, पिकांची विविधता, उत्तम बियाणं, तंत्रज्ञान, आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच याची सुविधा दिली जाते. ही योजना शेतीला फायदेशीर आणि शाश्वत व्यवसायात रूपांतरित करण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे.
३. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)
जर तुमचं पीक अतिवृष्टी, गारपीट, कीड किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झालं असेल, तर ही योजना तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. यामध्ये अत्यंत कमी प्रीमियमवर पीकविमा मिळतो, आणि नुकसान झाल्यास थेट खात्यावर नुकसानभरपाई जमा केली जाते. सध्या 50 हून अधिक पिकं या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.
४. कृषी उडान योजना (Krishi UDAN Scheme)
ही योजना विशेषतः डोंगरी, आदिवासी आणि ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसाठी आहे. यामध्ये फळं, भाज्या, फुलं, मासळी आणि दूध यांसारख्या उत्पादक गोष्टी 58 प्रमुख विमानतळांमार्फत देशभर पाठवण्याची सुविधा दिली जाते. त्यामुळे उत्पादने लवकर पोहोचतात, नासधूस कमी होते आणि शेतकऱ्यांना जास्त किंमत मिळते.
५. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (PMKSY)
"हर खेत को पानी" हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ड्रिप इरिगेशन, तलाव बांधणी, कालव्यांचं सुधारणं, आणि पाणीसाठा वाढवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. विशेषतः अशा भागांमध्ये जिथं मान्सूनवरच शेती अवलंबून आहे, तिथं ही योजना पाण्याच्या टंचाईपासून वाचवण्यासाठी अत्यंत गरजेची आहे.
या योजना केवळ आर्थिक सहाय्य देण्यासाठी नाहीत, तर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल किंवा त्यांच्याशी संबंधित असाल, तर या योजनांची माहिती आपल्या गावात, जिल्ह्यात पोहोचवा कारण खरी समृद्धी ही माहिती आणि संधी ओळखण्यात आहे!

