Health Alert: मुलांमध्ये पोषणाच्या कमतरतेमुळे जास्त भूक लागू शकते असे मुंबईतील नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ दिव्या आचरेकर सांगतात. त्यामुळे आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने अशा पदार्थांचा समावेश करा.

Health Alert: मुलांच्या वाढीनुसार त्यांच्या पोषणाच्या गरजा बदलतात, त्यामुळे आहारातील चौरसपणा राखणे महत्त्वाचे आहे. ज्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि लोहाचा समावेश असेल. रोजच्या आहारात 5 ते 6 वेळा थोडे-थोडे अन्न, हंगामी फळे, हिरव्या भाज्या, दूध, दही, तूप अशा गोष्टींचा समावेश करावा. बाहेरील पिझ्झा, बर्गर सारखे जंक फूड टाळून घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ, डाळ-भात, खिचडी आणि कडधान्ये अशा गोष्टी देण्यावर भर द्यावा. यावेळी मुलांच्या वयोमानाचा देखील अवश्य विचार करावा.

मुलांना कितीही खायला घातलं तरी त्यांची भूक भागत नाही, अशी तक्रार करणारे अनेक पालक आहेत. जास्त भूक लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुलांमध्ये काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील जास्त भूक लागू शकते, असे मुंबईतील नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ दिव्या आचरेकर सांगतात.

यामध्ये साखरयुक्त तृणधान्ये, गोड पेये, फास्ट फूड आणि पॅकेज केलेले पदार्थ यांचा समावेश होतो. यामध्ये कॅलरीज, मीठ, साखर आणि अनहेल्दी फॅट्स जास्त प्रमाणात असतात. पण जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर कमी प्रमाणात असतात.

अनेक मुले फक्त काही 'सुरक्षित' पदार्थच खातात आणि फळे, भाज्या, प्रथिनेयुक्त पदार्थ यांसारखे संपूर्ण अन्न गट टाळतात, ज्यामुळे पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.

मुलांना जंक फूड, फास्ट फूड जास्त आवडते. कारण त्यांच्या पॅकेजिंगवर चमकदार आणि रंगीबेरंगी चित्रे तसेच कार्टून कॅरेक्टर्स असतात. यामुळे अनहेल्दी पदार्थ अधिक आकर्षक वाटतात. त्याच वेळी, 'नैसर्गिक' आणि 'आरोग्यदायी' अशा लेबल्समुळे पालक या उत्पादनांमधील उच्च साखर आणि एडिटीव्हकडे दुर्लक्ष करतात.

पालक मुलांना असे पदार्थ सहजपणे देण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते बनवायला खूप सोपे असतात आणि काही मिनिटांत तयार होतात. यामुळे धावपळीच्या जीवनात त्यांचा बराच वेळ आणि ऊर्जा वाचते. पण यामुळे मुलांना अनेकदा संतुलित पोषण मिळत नाही.

मुलांना फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, लीन प्रोटीन, कडधान्ये आणि हेल्दी फॅट्स द्या. हे पदार्थ मुलांना आवश्यक पोषक तत्वे पुरवतात.