Auto Rickshaw: रिक्षाला 3 चाकं का असतात? 90% लोकांना हे माहित नाही! जाणून घ्या अधिक
Auto Rickshaw: सार्वजनिक वाहतूकीमध्ये रिक्षाला अनेकदा पहिल्या क्रमांकाची पसंती मिळते. मात्र या रिक्षाला चारऐवजी तीनच चाकं का असतात, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? यामागे काही खास कारणं आहेत. चला, ती काय आहेत ते जाणून घेऊया.

रिक्षाला तीनच चाकं का असतात?
भारतात ऑटो-रिक्षा हे वाहतुकीचं एक महत्त्वाचं साधन आहे. ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही, ते सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षा वापरतात. रिक्षा अनेकांच्या रोजगाराचं साधनही आहे. अनेक जण भाड्याने रिक्षा चालवून आपलं घर चालवतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की या रिक्षाला तीनच चाकं का असतात? चला, यामागची कारणं पाहूया.

१. अरुंद रस्त्यांवर सहजपणे यू-टर्न घेण्यासाठी
रिक्षा खास करून गर्दीच्या आणि अरुंद रस्त्यांवर चालवण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. तीन चाकांमुळे त्यांचा 'टर्निंग रेडियस' (वळण्यासाठी लागणारी जागा) खूप कमी असतो. यामुळे अगदी छोट्या गल्लीत किंवा गर्दीच्या ठिकाणीही रिक्षा सहजपणे यू-टर्न घेऊ शकते किंवा वळवता येते. चार चाकी गाड्यांना हे शक्य होत नाही.
2. उत्पादन आणि देखभाल खर्च कमी
चार चाकी वाहनांच्या तुलनेत तीन चाकी वाहनांचा असतो. एक चाक कमी झाल्यामुळे डिझाइन आणि उत्पादनासाठी लागणाऱ्या सुटे भागांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. टायर बदलणे, ब्रेक सर्व्हिसिंग यांसारखा देखभाल खर्चही कमी असतो. शिवाय, तीन चाकांमुळे रिक्षाचं वजन कमी राहतं, ज्यामुळे इंजिनवरचा ताण कमी होऊन इंधनाची बचत होते. यामुळे रिक्षाचालकांसाठी हा एक स्वस्त पर्याय ठरतो.
3. इंजिनवर कमी भार
चार चाकी वाहनांच्या तुलनेत तीन चाकी रिक्षाचं वजन खूप कमी असतं. वजन कमी असल्यामुळे इंजिनवरचा भार कमी होतो आणि मायलेज जास्त मिळतं. रिक्षाचालकांच्या रोजच्या कमाईसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. जर रिक्षाला चार चाकं असती, तर तिचा वेग कमी झाला असता आणि छोट्या रस्त्यांवरून वेळेत पोहोचणं कठीण झालं असतं. म्हणूनच रिक्षाला तीन चाकं असतात.
4. वाहतूक कोंडी नाही
रिक्षा प्रामुख्याने मध्यमवर्गीय, सामान्य ग्राहक किंवा स्वयंरोजगार करणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवली जाते. चार चाकी गाडीच्या किमतीपेक्षा रिक्षाची किंमत खूप कमी असल्यामुळे, सामान्य माणूसही कर्ज काढून ती सहज खरेदी करू शकतो. उत्पादन आणि दुरुस्तीचा खर्च कमी असल्यामुळे रिक्षा एक स्वस्त पर्याय ठरते. चार चाकी गाड्या जास्त इंधन वापरतात आणि वाहतूक कोंडीही करतात, पण रिक्षांमुळे हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होतं.

