Jade Plant तुमच्या जेड प्लांटची पानं गळतायत? योग्य प्रमाणात पाणी, भरपूर प्रकाश, चांगली माती, वेळोवेळी छाटणी आणि हलकं खत वापरून तुम्ही झाडाला घनदाट आणि निरोगी बनवू शकता. या ५ सोप्या टिप्समुळे तुमचं जेड प्लांट नेहमी हिरवंगार आणि मजबूत राहील.

Jade Plant जेड प्लांट (Crassula ovata) हे एक सुंदर आणि कमी देखभालीचं सक्युलेंट प्रकारातील झाड आहे. अनेक जण घराच्या सजावटीसाठी याचा वापर करतात. या झाडाचा आकर्षकपणा प्रत्येकालाच आवडतो, पण अनेकांची एक तक्रार असते की, झाडाला १०-१२ नवीन पानं आली की जुनी पानं गळायला लागतात. कधी पानं मऊ होऊन गळतात, तर कधी सुकतात आणि तुटतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे पाणी देण्याची चुकीची पद्धत, कुंडीतील पाण्याचा निचरा न होणं आणि कमी प्रकाश. जर तुम्हाला तुमचं जेड प्लांट घनदाट, जाड फांद्यांचं आणि चमकदार पानांनी भरलेलं हवं असेल, तर या ५ सोप्या टिप्स नक्की वापरा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पाणी देण्याचा योग्य नियम पाळा

जेड प्लांटला गरजेपेक्षा जास्त पाणी देणं ही सर्वात मोठी चूक आहे. कुंडीतील माती पूर्णपणे कोरडी झाल्यावरच पाणी द्या. साधारणपणे १० ते १५ दिवसांतून एकदा पाणी देणं पुरेसं असतं. कुंडीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर झाडाची मुळं सडू लागतात आणि पानं गळतात.

भरपूर पण इनडायरेक्ट प्रकाशात ठेवा

Jade Plant कमी प्रकाशात जेड प्लांटची वाढ थांबते आणि पानं कमकुवत होऊन गळू लागतात. या झाडाला अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळचं कोवळं ऊन किंवा भरपूर इनडायरेक्ट प्रकाश मिळेल. दुपारच्या कडक उन्हापासून झाडाला वाचवा, नाहीतर त्याची पानं जळू शकतात.

योग्य माती आणि ड्रेनेजची काळजी घ्या

जेड प्लांटसाठी हलकी आणि वाळूमिश्रित माती सर्वोत्तम असते. बागेतील मातीत वाळू किंवा पर्लाइट मिसळा, जेणेकरून पाणी लवकर निघून जाईल. कुंडीला पुरेशी ड्रेनेज होल्स (छिद्र) असणं खूप गरजेचं आहे. चिकट मातीत पाणी साचून राहतं, ज्यामुळे मुळांना नुकसान पोहोचतं.

वेळोवेळी छाटणी (Pruning) करा

जर तुम्हाला झाड घनदाट व्हावं असं वाटत असेल, तर वरच्या लांब फांद्यांची हलकी छाटणी करा. यामुळे बाजूने नवीन फांद्या फुटतात आणि झाड अधिक पसरट आणि भरगच्च दिसतं. सुकलेली आणि पिवळी पडलेली पानं लगेच काढून टाका.

हलकं पोषण (Nutrition) द्या

दर ४५ ते ६० दिवसांनी सक्युलेंट झाडांसाठीचं खत किंवा पातळ सेंद्रिय खत द्या. जास्त खत दिल्यानेही पानं गळू शकतात, त्यामुळे खताचा वापर कमी प्रमाणातच करा. याशिवाय, तुम्ही दर १५-२० दिवसांनी साधं पाणी घालण्याऐवजी तांदूळ धुतलेलं पाणी घालू शकता. हे पाणी आणि खत या दोन्हींचं काम करतं.