- Home
- Sports
- Cricket
- BCCI Contract : विराट-रोहितचं टेन्शन वाढलं? नव्या नियमामुळे दोघांनाही मोठा धक्का बसणार
BCCI Contract : विराट-रोहितचं टेन्शन वाढलं? नव्या नियमामुळे दोघांनाही मोठा धक्का बसणार
BCCI खेळाडूंच्या वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या सीनिअर खेळाडूंच्या अडचणी वाढू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
14

Image Credit : Getty
रोहित, विराट कोहलीला फटका?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठं वादळ निर्माण झालं आहे. BCCI ने एका महत्त्वाच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचा सर्वात मोठा फटका भारतीय क्रिकेटचे दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बसू शकतो, असं म्हटलं जात आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

24
Image Credit : twitter
काय आहे BCCI चा नवा नियम?
BCCI खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. आतापर्यंत खेळाडूंची सिनिऑरिटी, अनुभव आणि ब्रँड व्हॅल्यू यावर कॉन्ट्रॅक्टचे ग्रेड (A+, A, B, C) ठरवले जात होते. पण आता 'मॅचसाठी उपलब्धता' (Match Availability) आणि 'फिटनेस' याला BCCI मुख्य अट बनवण्याच्या तयारीत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, एखादा खेळाडू एका सिझनमध्ये किती सामन्यांसाठी फिट आणि उपलब्ध आहे, यावरच त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्ट मिळेल.
34
Image Credit : X/BCCI
या अचानक घेतलेल्या निर्णयामागे कारण काय?
गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचे अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतींमुळे महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकत आहेत. बोर्डाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून, खेळाडूंनी राष्ट्रीय संघाला प्राधान्य द्यावं, असं BCCI ला वाटतं. त्यामुळेच, कॉन्ट्रॅक्ट टिकवण्यासाठी किंवा वरचा ग्रेड मिळवण्यासाठी खेळाडूंना एका सिझनमध्ये किमान किती सामने खेळावे लागतील, याचा एक निकष ठरवण्याचा BCCI विचार करत आहे.
44
Image Credit : Twitter (x)
रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मोठा धक्का का?
हा नवीन नियम लागू झाल्यास, त्याचा सर्वात मोठा फटका रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बसू शकतो. कारण हे दोन्ही दिग्गज खेळाडू काही फॉरमॅटमधून विश्रांती घेतात आणि वर्षातून फक्त निवडक २-३ महत्त्वाच्या मालिकांमध्येच खेळतात. त्यामुळे एका सिझनमध्ये खेळलेल्या सामन्यांची संख्या कमी असल्यामुळे, BCCI च्या 'किमान सामन्यांच्या' अटीची पूर्तता करणं त्यांना शक्य होणार नाही. दिल्लीतील टी-20 सामन्यापूर्वी आलेल्या या बातमीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर हा नियम लागू झाला, तर सिनिऑरिटीच्या आधारावर टॉप ग्रेडमध्ये असलेले रोहित आणि विराट खालच्या ग्रेडमध्ये ढकलले जाऊ शकतात किंवा कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरही होऊ शकतात.

