Vande Bharat Express New Stops: प्रवाशांच्या मागणीमुळे मध्य रेल्वेने हुबळी-पुणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड व किर्लोस्करवाडी येथे अधिकृत थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

सांगली: प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. हुबळी–पुणे वंदे भारत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना आता दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर अधिकृत थांबा देण्यात येणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

यापूर्वी या जलदगती गाड्या फक्त निवडक स्थानकांवरच थांबत असत. मात्र, प्रवाशांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाने अखेर हा निर्णय घेतला असून, त्यामुळे प्रवास आणखी सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.

किर्लोस्करवाडी येथे वंदे भारतचा नवा थांबा – वेळापत्रक जाहीर

१) पुण्याहून हुबळी दिशेने जाणारी वंदे भारत एक्सप्रेस

२४ नोव्हेंबरपासून सायंकाळी ५:४३ वाजता किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबेल.

२) हुबळीहून पुण्याकडे येणारी वंदे भारत एक्सप्रेस

ही गाडी किर्लोस्करवाडी येथे सकाळी ९:३८ वाजेपर्यंत थांबा घेईल.

या निर्णयामुळे सांगली, वाल्वा, इस्लामपूर आणि परिसरातील प्रवाशांना वंदे भारतची सेवा अधिक जवळून उपलब्ध होणार आहे. रेल्वे अभ्यासकांच्या मते, दौंड आणि किर्लोस्करवाडी येथे मिळालेल्या नव्या थांब्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा फायदा होईल.

प्रवाशांसाठी मोठा दिलासा

दोन्ही मार्गांवरील हा अतिरिक्त थांबा प्रवाशांना केवळ सोयीचा ठरणार नाही, तर वंदे भारतसारख्या गतीमान सेवेतून प्रवास करण्याची उपलब्धताही वाढणार आहे. त्यामुळे या विभागातील प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.