- Home
- Maharashtra
- National Health Mission Update: NHM आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! पगारात किती टक्के वाढ?, जाणून घ्या मोठी अपडेट
National Health Mission Update: NHM आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! पगारात किती टक्के वाढ?, जाणून घ्या मोठी अपडेट
National Health Mission Update: महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत सुमारे ५०,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्के वाढ जाहीर केली. ही पगारवाढ जून २०२५ पासून लागू होणार आहे.

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या सुमारे ५०,००० कर्मचाऱ्यांच्या पगारात राज्य सरकारने १५ टक्के वाढ जाहीर केली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, जून २०२५ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. दीर्घकाळापासून वेतनवाढीसाठी आंदोलने करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, या पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल आणि आरोग्य विभागाची कार्यक्षमता अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
कशी असेल ही वेतनवाढ?
१५% पगारवाढीपैकी ५% वाढ सर्व कर्मचाऱ्यांना समान स्वरूपात दिली जाईल.
उर्वरित १०% वाढ वैयक्तिक कामगिरीच्या मूल्यांकनावर आधारित असेल.
ही वाढ on-call basis, daily wages, बाह्य स्त्रोत यंत्रणेद्वारे नेमलेले, तसेच राजीनामा दिलेले किंवा सेवामुक्त झालेले कर्मचारी यांना लागू होणार नाही.
इतर सकारात्मक पावलं
राज्य सरकारने केवळ वेतनवाढीपुरतेच न थांबता, इतर अनेक प्रलंबित मागण्यांकडेही सकारात्मक पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत:
सलग १० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करणे
ESIC अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ
गंभीर आजार, अपंगत्व किंवा मृत्यूच्या प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना विशेष भत्त्यांची तरतूद
२०१६-१७ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करणे
या निर्णयाचे NHM कर्मचाऱ्यांनी केलं स्वागत
या निर्णयाचे राज्यभरातल्या NHM कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. दीर्घकाळापासून मागणी असलेली वेतनवाढ आता प्रत्यक्षात आल्यानं, कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे. हे पाऊल आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीसाठी एक सकारात्मक टप्पा मानला जात आहे.

