MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘हे’ ओळखपत्र नसेल तर नुकसान भरपाई मिळणार नाही, शासनाचा नवा निर्णय

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘हे’ ओळखपत्र नसेल तर नुकसान भरपाई मिळणार नाही, शासनाचा नवा निर्णय

मराठवाड्यातील महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘ॲग्रिस्टॅक योजने’अंतर्गत, १५ जुलै २०२५ पासून पीक नुकसानभरपाई मिळवण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असेल. 

2 Min read
Rameshwar Gavhane
Published : Sep 27 2025, 09:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
महापुरामुळे शेतकरी संकटात
Image Credit : Getty

महापुरामुळे शेतकरी संकटात

मुंबई: मराठवाड्यातील भीषण महापुरामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धोका उभा आहे. अनेक भागांत पिके वाहून गेली असून, शेतकऱ्यांच्या आयुष्याला मोठा तडका बसला आहे. अशा संकटात मदत देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी अर्ज करताना ‘फार्मर आयडी’ अनिवार्य ठेवण्यात येणार आहे. 

26
काय आहे हा नवीन नियम?
Image Credit : Social Media

काय आहे हा नवीन नियम?

राज्याच्या कृषी विभागाकडून केंद्र सरकारच्या ‘ॲग्रिस्टॅक योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांना मदत दिली जाते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नुकसानभरपाईसाठी अर्ज करताना आता १५ जुलै २०२५ पासून ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केला जाईल. हा निर्णय २९ एप्रिल २०२५ रोजी शासनाने अधिकृतपणे जाहीर केला आहे. 

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Related image2
Maharashtra Farmer Rain Relief : या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाईची रक्कम, वाचा किती पैसे मिळाले?
36
निर्णयामागचा हेतू
Image Credit : Social Media

निर्णयामागचा हेतू

शासनाने सांगितले आहे की, कृषी क्षेत्रातील मदत आणि योजना जलद व प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ॲग्रिस्टॅक’ प्रणाली वापरली जाईल. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक खास ‘फार्मर आयडी’ दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांची ओळख खात्रीशीरपणे करता येईल. 

46
नुकसानभरपाई प्रक्रियेत काय बदल?
Image Credit : Social Media

नुकसानभरपाई प्रक्रियेत काय बदल?

पंचनामे करताना शेतकऱ्याच्या नावासोबत ‘फार्मर आयडी’साठी स्वतंत्र रकाना राखला जाईल.

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) मध्ये ‘फार्मर आयडी’ नोंदवणे बंधनकारक ठरेल.

राज्यात हळूहळू ई-पंचनामा प्रणालीही सुरू केली जात आहे, ज्यात ही नोंदणी आवश्यक असेल. 

56
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
Image Credit : Social Media

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा

महापुर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी आता फार्मर आयडीशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेळेवर आपला फार्मर आयडी तयार करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या नव्या नियमामुळे मदत वेगाने आणि अडथळ्यांशिवाय मिळण्यास मदत होईल, असा शासनाचा विश्वास आहे. 

66
‘फार्मर आयडी’ काळाजी गरज
Image Credit : Social Media

‘फार्मर आयडी’ काळाजी गरज

मराठवाडा भागातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मदतीचा मोलाचा आधार ठरणार आहे. शासनाच्या या नवीन नियमामुळे फार्मर आयडी असलेले शेतकरीच नुकसानभरपाईसाठी पात्र ठरतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपला ‘फार्मर आयडी’ मिळवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
Recommended image2
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट
Recommended image3
School Bandh : शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात राज्यातील शिक्षकांचा ‘बंद’; ८० हजारांहून अधिक शाळांवर परिणाम
Recommended image4
BMC Elections 2025 : महानगरपालिका निवडणुका लवकर? मतदारयाद्या 10 डिसेंबरला; आचारसंहिता 15 ते 20 तारखेदरम्यान लागू होण्याची शक्यता
Recommended image5
तुमचं रेल्वे स्टेशन 'वगळलं' गेलंय का? पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल... संगमनेरचा पत्ता कट, वाचा अहिल्यानगरचं भविष्य!
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Recommended image2
Maharashtra Farmer Rain Relief : या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाईची रक्कम, वाचा किती पैसे मिळाले?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved