- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: पाऊस अजून गेला नाही! राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Alert: पाऊस अजून गेला नाही! राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाचा इशारा दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण २३ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाची पुन्हा राज्यात एन्ट्री!
मुंबई: राज्यात काही दिवस उन्हाळी वातावरणानंतर पुन्हा एकदा पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या १५ ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे एकूण २३ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning , light to moderate rain , gusty winds 30 -40 kmph very likely to occur at isolated places over South Madhya Maharashtra and Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/PxvBkKEaVc— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 14, 2025
कोकण विभाग
मुंबई आणि पालघरमध्ये वातावरण कोरडे राहणार आहे.
ठाणे आणि रायगडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा.
विजांच्या कडकडाटामुळे सतर्कतेचा सल्ला.
उत्तर महाराष्ट्र
धुळे आणि नंदुरबारमध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता.
नाशिक आणि जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.
अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा; यलो अलर्ट.
विदर्भ
अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट अपेक्षित; यलो अलर्ट.
नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामानात होणाऱ्या अचानक बदलांमुळे नागरिकांनीही आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाचा परतीचा मोसम सुरू असून, हा पाऊस शेवटचा की पुन्हा काहीतरी अनपेक्षित घडणार? हवामान खात्याच्या पुढील अपडेट्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

