- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात वादळी पावसाचा धोका, 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात वादळी पावसाचा धोका, 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

महाराष्ट्रावर पावसाचे संकट अधिक गडद
मुंबई: महाराष्ट्रावर पावसाचे संकट अधिक गडद झाले असून, हवामान विभागाने गुरुवार, 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तब्बल 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तर काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/nMpDmL5dwq— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 25, 2025
कोकण आणि मुंबई क्षेत्र
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसाची शक्यता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होणार.
घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता.
मराठवाडा
संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज.
काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.
नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहमदनगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार सरींची शक्यता.
विदर्भ
अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट.
बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाचा अंदाज.
नागरिक व शेतकऱ्यांसाठी सूचना
राज्यात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहू शकतो. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

