MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • युद्धाचा भडका आणि खतांचा तुटवडा! खरीप हंगामापूर्वीच बळीराजाच्या चिंतेत भर; काय आहे नेमकं संकट?

युद्धाचा भडका आणि खतांचा तुटवडा! खरीप हंगामापूर्वीच बळीराजाच्या चिंतेत भर; काय आहे नेमकं संकट?

Fertilizer Shortage In India: जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे, विशेषतः आखाती देशांतील तणावामुळे, भारताची खत आयात धोक्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात खतांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 07 2026, 03:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
युद्धाचा भडका आणि खतांचा तुटवडा! खरीप हंगामापूर्वीच बळीराजाच्या चिंतेत भर
Image Credit : X

युद्धाचा भडका आणि खतांचा तुटवडा! खरीप हंगामापूर्वीच बळीराजाच्या चिंतेत भर

मुंबई: जगाच्या पाठीवर भारत हा एक प्रमुख कृषीप्रधान देश असून देशात सुमारे १.५४० लाख हेक्टर लागवडीयोग्य जमीन आहे. मात्र, सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता भारतीय शेतीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसमोर खत टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
खतांच्या गणितात खळबळ
Image Credit : ChatGPT

खतांच्या गणितात खळबळ

भारतात खरीप हंगामात सुमारे १.१०० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. या मोठ्या क्षेत्रासाठी सुमारे ३९० लाख टन खतांची गरज भासते, ज्यामध्ये १९० लाख टन एकट्या युरियाचा समावेश असतो. सध्या देशात ४६ टक्के साठा उपलब्ध असला तरी, उर्वरित पुरवठा हा पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. मात्र, जागतिक तणावामुळे या आयातीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. 

Related Articles

Related image1
शेतात जायला रस्ता मिळत नाहीये? शेजारचा शेतकरी अडवणूक करतोय? 'या' सरकारी नियमाने मिळवा हक्काची वाट!
Related image2
Monsoon 2026 : ‘एल निनो’चा प्रभाव; यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
37
आखाती तणाव: खत पुरवठ्याचा मुख्य अडथळा
Image Credit : our own

आखाती तणाव: खत पुरवठ्याचा मुख्य अडथळा

आखाती देशांमधील वाढता संघर्ष आणि 'होर्मुझ सामुद्रधुनी'मधील विस्कळीत वाहतूक हे खत टंचाईचे मुख्य कारण ठरत आहे. या मार्गावरून भारताला युरिया आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. मात्र, युद्धाच्या सावटाखाली जहाज वाहतूक ठप्प झाल्याने पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे. 

47
या देशांवरील अवलंबित्व पडणार महाग?
Image Credit : our own

या देशांवरील अवलंबित्व पडणार महाग?

भारत प्रामुख्याने रशिया, ओमान, सौदी अरेबिया, मोरोक्को, कॅनडा आणि चीन या देशांकडून डीएपी, पोटॅश आणि युरियाची आयात करतो.

चीनची अडवणूक: करार होऊनही चीनकडून अपेक्षित पुरवठा होत नसल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

वाहतूक खर्च: विम्यातील वाढते दर आणि लांबच्या समुद्रमार्गाचा वापर यामुळे खतांच्या आयात खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. 

57
देशांतर्गत उत्पादनालाही 'ब्रेक'
Image Credit : our own

देशांतर्गत उत्पादनालाही 'ब्रेक'

खते बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक वायूचा पुरवठा केवळ ६० टक्के होत असल्याने देशांतर्गत कारखान्यांची उत्पादन क्षमता घटली आहे. स्फुरद आणि पोटॅशसारख्या खतांसाठी भारत आजही ९० टक्के आयातीवर अवलंबून आहे, जी सध्या जवळपास ठप्प झाली आहे. 

67
तिजोरीवर अनुदानाचा बोजा
Image Credit : our own

तिजोरीवर अनुदानाचा बोजा

खतांच्या वाढत्या किमतींचा भार शेतकऱ्यांवर पडू नये म्हणून केंद्र सरकार हजारो कोटींचे अनुदान (Subsidy) देते. रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी हे अनुदान २.२५ लाख कोटींपर्यंत पोहोचले होते. यंदाही हा आकडा २ लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे आहेत. 

77
खरिपाचे यश आव्हानात्मक!
Image Credit : our own

खरिपाचे यश आव्हानात्मक!

सध्या देशाकडे केवळ दोन महिने पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. अशा स्थितीत

खतांचा काळाबाजार रोखणे.

उपलब्ध साठ्याचे न्याय्य वाटप करणे.

दरवाढ नियंत्रणात ठेवणे.

या त्रिसूत्रीवरच यंदाच्या खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे. बळीराजासाठी हा काळ अत्यंत संघर्षाचा असून प्रशासकीय नियोजनाची आता कसोटी लागणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
महाराष्ट्रात कुठं होणार मुसळधार पाऊस कुठं तुरळक, वादळी वाऱ्यासह या भागाला दिला रेड अलर्ट
Recommended image2
बिष्णोई गँगकडून आता या आमदाराला धमकी, यावर विधानसभेत रणकंदन
Recommended image3
Ketan Agarwal Case : लग्नानंतर राजस्थानला राहण्याचा प्लॅन; सियाकडून पैशांची सोय, चेतनच्या मित्रांची माहिती
Recommended image4
2nd July 2025 News Updates: महाराष्ट्रात कुठं होणार मुसळधार पाऊस कुठं तुरळक, वादळी वाऱ्यासह या भागाला दिला रेड अलर्ट
Recommended image5
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचा जोर वाढला! मुंबईसह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
Related Stories
Recommended image1
शेतात जायला रस्ता मिळत नाहीये? शेजारचा शेतकरी अडवणूक करतोय? 'या' सरकारी नियमाने मिळवा हक्काची वाट!
Recommended image2
Monsoon 2026 : ‘एल निनो’चा प्रभाव; यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved