Cyber Crime in Maharashtra : राज्यात प्रत्येक दिवशी सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांचे होतेय तीन कोटी रुपयांचे नुकसान

| Published : Feb 12 2024, 11:07 AM IST / Updated: Feb 12 2024, 11:10 AM IST

Cyber Fraud Lucknow Doctor

सार

महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये वर्ष 2019 नंतर 1300 कोटी रुपयांपैकी फक्त 10 टक्के वसूली करण्यात आल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली आहे. याशिवाय राज्यातील नागरिकांचे दररोज तीन कोटी रुपयांचे नुकसान सायबर गुन्ह्यांमुळे होतेय. 

Cyber Crime in Maharashtra : सायबर गुन्ह्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत महाराष्ट्राने नुकसान भरपाईसाठी संघर्ष केला आहे. वर्ष 2019 नंतर केवळ 134 कोटी रुपयांपैकी 10 टक्के रक्कम पोलीस तपासातून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली आहे.

शनिवारी (10 फेब्रुवारी) सायबर सिक्युरिटी सोल्यूशन फर्म क्विक हील टेक्नॉलॉजीज (Quick Heal Technologies) यांच्याकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना शिंत्रे यांनी म्हटले की, "सायबर गुन्ह्यांपासून दूर राहण्यासाठी एक मजबूत प्रणालीची आवश्यकता आहे. पोलीस दलाच्या प्रयत्नाशिवाय शिंत्रे यांनी याबद्दलही म्हटले की, राज्यात सायबर गुन्ह्यांमुळे पीडित नागरिकांचे दररोज चार ते पाच हजार फोन येतात. महाराष्ट्रात दररोज तीन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे."

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जारी केली राज्यातील सायबर गुन्ह्याची आकडेवारी
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) आकडेवारीनुसार शिंत्रे यांनी खुलासा केला की, वर्ष 2022 मध्ये महाराष्ट्रात 8242 सायबर गुन्हे घडले. जे गेल्या वर्षाच्या (2023) तुलनेत वर्ष 2022 मध्ये 48 टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर वर्ष 2022 मध्ये 65,893 सायबर गुन्हे समोर आले होते.

राज्यात सायबर सुरक्षिततेसाठी योजना तयार केली जाणार
राज्यातील नागरिकांची सायबरच्या माध्यमातून होणारे फसवणूकीचे प्रकार टाळण्यासाठी एक मोठ्या स्वरुपात सायबर योजना लवकरच तयार केली जाणार असल्याची माहिती शिंत्रे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत एक हेल्पलाइन क्रमांक देखील दिला जाणार आहे. ज्यावर नागरिकांना तक्रार करता येईल.

नागरिकांची अशी केली जाते फसवणूक
राज्यातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्यांना भीती दाखणे-धमकावण्यासाठी सायबर हल्लेखोर पोलीस अधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांचे बनावट प्रोफाइल तयार करतात. याशिवाय सायबर हल्लेखोर पीडित व्यक्तींना व्हिडीओ कॉल करून स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांशी बोलत त्यांना पैशांचे पेमेंट करण्यासाठी भाग पाडतात.

सायबर हल्लेखोरांकडून प्रतिदिन दोन कोटी नागरिकांना केले जाते टार्गेट
वेगवेगळ्या एजेंसीच्या आकडेवारीनुसार भारतातील सायबर हल्लेखोर प्रतदिन एक ते दोन कोटी नागरिकांना टार्गेट करतात. देशात 120 कोटी नागरिक इंटरनेटचा वापर करतात. त्यापैकी 80 टक्के नागरिक स्मार्टफोनचा वापर करतात. अशातच वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे काही ठोस उपाय करणे आवश्यक असल्याचे शिंत्रे यांनी कार्यक्रमावेळी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

Maharashtra : 'गीताभक्ती' कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती, म्हणाले- मुघलांमुळे नव्हे शिवाजी महाराजांमुळे आमची ओळख

अजित पवार यांचीच खरी NCP, लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा झटका

शिवसेना गटाचे माजी नगरसेवक यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने मृत्यू, मुंबई पोलिसांनी दिली माहिती