- Home
- lifestyle
- Jagannath Mandir Puri Rath Yatra Marathi : सोन्याच्या झाडूने रस्ता का साफ करतात? राजा या झाडूने रस्ता का झाडतो?
Jagannath Mandir Puri Rath Yatra Marathi : सोन्याच्या झाडूने रस्ता का साफ करतात? राजा या झाडूने रस्ता का झाडतो?
कोलकाता - ही रथयात्रा फक्त एक धार्मिक उत्सव नसून इतिहास, भक्ती आणि शतकानुशतके चालत आलेल्या परंपरांचं एक जिवंत रूप आहे. या यात्रेतला अनोखा रिवाज म्हणजे सोन्याच्या झाडूने रस्ता झाडतात. येथील राजा हातात झाडू घेऊन रस्ता झाडतो. वाचा असे का केले जाते…

धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक
दरवर्षी, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला ओडिशातील पुरी शहरात भगवान जगन्नाथांची प्रसिद्ध रथयात्रा साजरी केली जाते. हा सोहळा केवळ ओडिशातच नाही तर संपूर्ण भारतात धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक मानला जातो.
रथ ओढल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते
या शुभ तिथीनिमित्त, देश-विदेशातून लाखो भाविक पुरीत येतात, जेणेकरून ते भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे भाऊ भगवान बलराम आणि बहीण देवी सुभद्रा यांचे विशाल रथ ओढण्याचे भाग्य मिळवू शकतील. रथ ओढल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते अशी मान्यता आहे.
विधींचे एक जिवंत रूप
ही रथयात्रा फक्त एक धार्मिक उत्सव नसून परंपरा, भक्ती आणि शतकानुशतके चालत आलेल्या विधींचे एक जिवंत रूप आहे. त्यात गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे सहभागी होतात. यात कोणताही भेदभाव केला जात नाही.
मावशीचे घर मानले जाते
यात्रेदरम्यान अनेक विशेष विधी केले जातात, जे हा उत्सव अत्यंत पवित्र आणि खास बनवतात. भगवंतांना रथात बसवून गुंडिचा मंदिरात नेले जाते, जे त्यांचे मावशीचे घर मानले जाते. अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते. तिचे अनोखे धार्मिक महत्त्व आहे.
ते काही दिवस विश्रांती घेतात
तिथे ते काही दिवस विश्रांती घेतात आणि नंतर परत येतात. जगन्नाथ रथयात्रेचा हा सोहळा भाविकांसाठी एक भावनिक विषय देखील आहे, जिथे विश्वास, सेवा आणि भक्ती तिच्या शिखरावर असते.
अनेक राज्यातील सांस्कृतिक दर्शन
हा उत्सव केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही भारताची विविधता आणि एकता दर्शवतो. अनेक राज्यातील सांस्कृतिक दर्शनही येथे घडते. त्यामुळे विदेशातूनही पर्यटक हा सोहळा बघण्यासाठी येतात.
अनोखी परंपरा पाळली जाते
पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत एक अत्यंत विशेष आणि अनोखी परंपरा पाळली जाते, जी या उत्सवाची पवित्रता आणि धार्मिक खोली आणखी वाढवते. या परंपरांना यावेळी विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे काही स्थानिक आख्यायिकाही आहेत.
झाडू जवळपास सोन्यात घडवलेला असतो
रथयात्रा सुरू होण्यापूर्वी, एक विशेष कार्यक्रम होतो जिथे प्रभूच्या रथाचा मार्ग साफ केला जातो. या कार्यक्रमातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे सफाई एका विशेष झाडूने केली जाते, ज्याच्या दांड्यावर सोन्याचे काम केले असते. हा झाडू जवळपास सोन्यात घडवलेला असतो. हा सुवर्ण झाडू रस्ता झाडण्यासाठी वापरला जातो. त्या मार्गावरुन रथ जातो.
सर्वसामान्याप्रमाणे वर्तन ठेवावे लागते
ही झाडू कोणतीही सामान्य व्यक्ती वापरत नाही, तर राजघराण्यातील राजा किंवा त्याचा प्रतिनिधी स्वतःच्या हाताने झाडकाम करतो. म्हणजे राजा असो किंवा कोणी श्रीमंत व्यक्ती त्याला या रथयात्रेत आपले स्थान त्यात करुन सर्वसामान्याप्रमाणे वर्तन ठेवावे लागते.
राजाही नाही म्हणत नाही
या प्रतिकात्मक सफाईचा उद्देश प्रभूचा मार्ग पवित्र करणे आणि दाखवणे आहे की देवासमोर सगळे समान आहेत, मग तो राजा असो वा सामान्य भक्त. विशेष म्हणजे या कामासाठी राजाही नाही म्हणत नाही. तो उत्साहाने या परंपरेत सहभागी होतो.
सोन्याच्या झाडूने सफाई
पुरीची जगन्नाथ रथयात्रा एका अत्यंत विशेष आणि शुभ परंपरेने सुरू होते. रथ ओढण्यापूर्वी, भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचा मार्ग एका विशेष पद्धतीने शुद्ध केला जातो.
गजपती महाराज किंवा त्यांचा प्रतिनिधी
या सफाईसाठी, सोन्याच्या दांड्या असलेला झाडू वापरला जातो, जो राजघराण्यातील व्यक्ती गजपती महाराज किंवा त्यांचा प्रतिनिधी स्वतःच्या हाताने चालवतात.
रथयात्रेची औपचारिक सुरुवात
या पवित्र सफाईनंतर वैदिक मंत्रांचा जप केला जातो, जो वातावरणाला आध्यात्मिक शक्तीने भरतो. हा संपूर्ण विधी रथयात्रेची औपचारिक सुरुवात मानली जाते.
झाडूलाही सोन्याने मढवले जाते
सोने हे अत्यंत शुद्ध आणि शुभ धातू असल्याने ते देवपूजा आणि विशेष धार्मिक विधींमध्ये वापरले जाते. सोन्याला या यात्रेत विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच झाडूलाही सोन्याने मढवले जाते.
भगवंतांचे स्वागत करण्यासाठी भूमी तयार केली जाते
जेव्हा या धातूपासून बनवलेल्या झाडूने भगवंतांचा मार्ग साफ केला जातो, तेव्हा ते स्थान अधिक पवित्र होते जणू भगवंतांचे स्वागत करण्यासाठी भूमी तयार केली जात आहे.
आदर, भक्ती आणि नम्रतेचे प्रतीक
ही परंपरा हे देखील दर्शवते की भाविक त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम गोष्टी भगवंतांना अर्पण करू इच्छितात. ही केवळ एक सफाई प्रक्रिया नाही तर आदर, भक्ती आणि नम्रतेचे प्रतीक आहे, जिथे मन, वचन आणि कर्माने भगवंतांची सेवा केली जाते.
धार्मिक महत्त्व
पुरी रथयात्रेपूर्वी विशेष सफाई विधीमध्ये सोन्याच्या झाडूचा वापर केवळ परंपरेचा विषय नाही तर त्याला धार्मिक महत्त्वही आहे. या झाडूला अतिशय पवित्र मानले जाते.
खोल विश्वास आणि आदराचे प्रतीक
सोन्याला नेहमीच शुभ, पवित्रता आणि दैवत्वाचे प्रतीक मानले जात आहे. म्हणून जेव्हा सोन्याच्या दांड्या असलेल्या झाडूने भगवान जगन्नाथांचा मार्ग साफ केला जातो, तेव्हा तो केवळ एक विधी नाही तर खोल विश्वास आणि आदराचे प्रतीक आहे.
मनापासून केलेले हे काम
हा विधी ही भावना दर्शवतो की भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्वोत्तम असले पाहिजे. त्यात कोणतीही काटकसर करायला नको. मनापासून केलेले हे काम असते.
भाविकांच्या निःस्वार्थ सेवेची निष्ठा आणि जाणीव
मार्ग साफ करणे ही एक प्रतिकात्मक पद्धत आहे जी दर्शवते की भाविक त्यांच्या देवतेचे स्वागत करण्यासाठी पूर्ण तयारी आणि आदराने पुढे येतात. हे भाविकांच्या निःस्वार्थ सेवेची निष्ठा आणि जाणीव दर्शवते.

