एकूण मृतांपैकी २० जणांचे पॅन्ट काढलेले आढळून आले आहे. त्यांचा खतना झाला आहे, की नाही हे तपासल्यानंतरच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

श्रीनगर ः पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. त्यातून बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकूण मृतांपैकी २० जणांचे पॅन्ट काढलेले आढळून आले आहे. त्यांचा खतना झाला आहे, की नाही हे तपासल्यानंतरच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पर्यटक दिसल्यानंतर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला नाही. तर दहशतवाद्यांनी प्रत्येक पर्यटकाला त्याचा धर्म विचारला. यावेळी हिंदू पर्यटक असल्याचे समोर आल्यावर ठार मारले. तसेच आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स चेक केले. त्यातून ते हिंदू असल्याचे समोर आल्यावर ठार मारले. काहींना कलमा म्हणायला सांगितले. २० पर्यटकांना तर पॅन्ट काढायला सांगितले. खतना झाला नसल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला.

बहुतेक पर्यटकांच्या डोक्यात किंवा छातीवर गोळ्या मारण्यात आल्या आहेत. म्हणजेच अतिशय जवळून गोळीबार करण्यात आला. त्यामुळे २६ मृतांपैकी २५ हिंदू पुरुष आहेत. यावेळी दहशतवाद्यांनी महिलांवर गोळीबार केला नाही. केवळ पुरुषांना टार्गेट केले.

पहलगाम येथील मैदानावर घटनेच्या दिवशी अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक नागरिकही होते. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला असता तर स्थानिक नागरिकही त्यात मृत्युमुखी पडले असते. तसेच महिलाही ठार झाल्या असत्या. त्यामुळे दहशतवाद्यांनी तसे न करता पर्यटक हिंदू आहे का, तसेच ते पुरुष आहेत याची खात्री झाल्यानंतर गोळीबार केला.

------------------------------